शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

वसई किल्ल्यात गैरप्रकार! किल्ला वाचवण्यासाठी ‘बेमुदत उपोषण’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 22:50 IST

पोलीस, महापालिका व पुरातत्त्व खात्याचे दुर्लक्ष?

वसई : ऐतिहासिक नरवीर रणवीर चिमाजी अप्पांच्या किल्ल्यात दिवसेंदिवस विविध गैरप्रकार होताना दिसत आहेत. जेवणावळी असो की ओल्या पार्ट्यांसोबत प्री-वेडिंग फोटोग्राफी, विवाहपूर्व छायाचित्रणाच्या नावाखाली बीभत्स छायाचित्रण आणि प्रेमीयुगुलांचे अश्लील चाळे आदी अनेक गैरप्रकारांच्या तक्रारी करूनही पुरातत्त्व विभाग कोणतीही कापवाई करीत नसल्याने येथील दुर्गप्रेमींनी पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

वसईतील पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला ऐतिहासिक किल्ल्यास दररोज अनेक पर्यटक भेट देत असतात. मात्र वसईच्या किल्ल्यात कोणत्याही प्रवेशमार्गावर तपासणी केंद्र नसल्याने दिवसा कोणत्याही वेळी तसेच रात्री-अपरात्री या ठिकाणी कोणीही येतो. त्यामुळे किल्ल्यात विविध गैरप्रकारांना ऊत आला आहे. अनेक जण पुरातत्त्व खात्याची कोणतीही परवानगी न घेता किल्ल्यात येऊन बिनधास्त आपल्याला हवे तसे चित्रीकरण करतात. हे चित्रीकरण कशाचे असते याची माहितीही पुरातत्त्व विभागाला नसते.

वसई किल्ल्यातील विशेषत: संत गोन्सालो गार्सिया चर्च तसेच सेंट फ्रान्सिस्कन चर्चचा वापर हा विनापरवानगी मोठ्या प्रमाणात विशिष्ट उत्पादनाच्या जाहिरात चित्रीकरणासाठी केला जात आहे. दरम्यान दिवस-रात्र या ठिकाणी प्री-वेडिंगच्या नावाखाली सर्रास चित्रीकरण सुरू असते. कित्येक वेळा कोणतीही परवानगी न घेता त्यांना हवी तशी छायाचित्रे घेतात, काही वेळा चित्रीकरणही करतात. दुर्गमित्रांनी गैरप्रकाराच्या तक्रारी केल्या की त्याची नोंदवहीत दखल घेतली जाते. मात्र प्रत्यक्षात कोणतीही कारवाई होत नाही, अशी खंत इतिहास अभ्यासक डॉ. श्रीदत्त राऊत यांनी व्यक्त केली आहे.प्री-वेडिंग फोटोग्राफी डोकेदुखी?च्वसईत सध्या विवाहपूर्व छायाचित्रणाचा धुमाकूळ सुरू असून यासाठी वसई किल्ल्याची निवड केली जाते. विवाहपूर्व छायाचित्रणाच्या नावाखाली काही जण अश्लील वाटावे असे छायाचित्रण करतात.च्यासाठी किल्ल्यातील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या वास्तूही पायदळी तुडविल्या जातात. वसई किल्ल्यात महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील पर्यटकही येतात.च्खरे तर या ठिकाणी महापालिका व स्थानिक पोलीस प्रशासन यांनी विशेष लक्ष घालून पुरातत्त्व खात्याशी संपर्क करून एक संयुक्त कारवाई राबवणे आवश्यक आहे, मात्र तसे होत नाही.मागील वर्षीच्या आंदोलनाची दखल कागदावरच !वसई किल्ल्यातील गैरप्रकारांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्रातील दुर्गप्रेमी तथा इतिहास अभ्यासकांनी गतवर्षी १५ आणि १६ डिसेंबर रोजी किल्ल्यात आंदोलन केले होते. त्या वेळी किल्ल्यातील सर्व गैरप्रकारांवर कारवाई करण्याचे आश्वासन पुरातत्त्व विभागाकडून देण्यात आले होते, मात्र आजपर्यंत याविरुद्ध कोणतीही ठोस अशी कारवाई झाली नाही.आता किल्ला वाचविण्यासाठी बेमुदत उपोषण !या पुढील आमचे दुर्गप्रेमीचे आंदोलन बेमुदत उपोषण असणार आहे. सरकारची मानसिकता नसेल तर ती बदलण्यास आम्ही भागपाडू, असेही इतिहास अभ्यासक डॉ. श्रीदत्त राऊत यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार