शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

डहाणूतील अनेक गावपाडे आजही नेटवर्कविना; गावकरी सोशल मीडियापासून दूरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2020 00:37 IST

डहाणू तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी आहेत. डहाणूतील मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या पलीकडील भागात काही गावपाड्यांत नेटवर्क नसल्याने मोबाइल कॉल लागत नाही.

शौकत शेख

डहाणू : मुंबईपासून १२० किमी अंतरावर असलेल्या डहाणू तालुक्यातील असंख्य खेड्यापाड्यांत अद्यापही इंटरनेट सुविधा नसल्याने येथील ग्रामस्थ सध्याच्या जगापासून, सोशल मीडियापासून दूरच आहेत. कोरानामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाइन होत आहे. मात्र डहाणूच्या दुर्गम भागात नेटवर्कअभावी विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेता येत नाही. येथील आदिवासींना शैक्षणिकबरोबरच विविध शासकीय योजनेचे लाभ घेण्यासाठी ३० ते ४० किलोमीटर अंतरावर डहाणू शहरात येऊन अर्ज करावे लागतात. या खेड्यापाड्यांत नेटवर्कची सुविधा यावी, यासाठी प्रशासन उपाययोजना करीत नाही, अशी खंत ग्रामस्थ व्यक्त करतात.

डहाणू तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी आहेत. डहाणूतील मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या पलीकडील भागात काही गावपाड्यांत नेटवर्क नसल्याने मोबाइल कॉल लागत नाही. डहाणूपासून ४५ किलोमीटर अंतरावर असलेल्या सायवन गावात गेल्या दोन वर्षांपासून इंटरनेट नेटवर्क सुविधा नाही. कासापासून १५ किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. येथे परिसरातील आदिवासी दैनंदिन वस्तू खरेदी-विक्रीसाठी येतात. येथे ग्रामीण आरोग्य रुग्णालय, बँका, जिल्हा परिषद शाळा, पोलीस ठाणे, वनविभाग कार्यालय, ग्रामपंचायत आहे. परंतु नेटवर्कअभावी प्रशासकीय कामाचाही अनेकदा खोळंबा होतो.

सध्या प्रशासन सरकारच्या बहुसंख्य योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवत असते. या योजनांची येथील नागरिकांपर्यंत योग्य रीतीने माहिती पोहोचत नाही. त्यांचा गोंधळ उडतो. डहाणूच्या गंजाड, शेल्टी, वधना, रानशेत, साखरे, खुबाले, अवधानी, रायपूर इ. गावांत फोन लागत नसल्याने ग्रामस्थांना १०-१५ किलोमीटर अंतरावर जाऊन संपर्क साधावा लागतो.  या गावपाड्यात नेटवर्कसाठी लवकर योग्य ती सोय करावी, अशी मागणी होत आहे.

आमच्याकडील भागात सातत्याने भूकंप होत आहे. मात्र आमचे फोन लागत नाहीत. या भागात एखादी घटना घडल्यावर प्रशासनाशी संपर्क साधायचा कसा? असा प्रश्न पडतो.-  रामदास सुतार, खुबाळे, डहाणू

टॅग्स :Internetइंटरनेट