शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

वसईतील बेघर परप्रांतीयांचा जंगलात आसरा; श्रमिक ट्रेनमध्ये नंबर लागत नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 11:35 PM

वसईतील बेघर परप्रांतीयांचा जंगलात आसरा; श्रमिक ट्रेनमध्ये नंबर लागत नाही :

- प्रतीक ठाकूर विरार : हाताला काम नाही, भाडे भरण्यास पैसे नसल्याने घर रिकामे करावे लागले. गावाला जायचे तर श्रमिक ट्रेनमध्ये नंबर लागत नाही. अशा अनेक संकटात सापडलेल्या मजुरांवर आता परिवारासह जंगलात राहण्याची वेळ आली आहे. नालासोपारा येथील संतोष भुवनच्या जंगलातील डोंगरावर अशा प्रकारे सध्या काही मजूर राहात आहेत.

उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथे जाण्यास निघालेले सद्दाम अन्सारी आणि त्यांचे कुटुंबीय मंगळवारी वसईतील एव्हरशाईन येथे पोहोचले. पण इतरांप्रमाणेच त्यांच्याही पदरी निराशा आली. सकाळी ६.३० पासून वाट पाहात थांबल्यानंतर अखेर दुपारी ३.३० वाजता त्यांना येथून कोणतीही गाडी सुटणार नाही, असे सांगण्यात आले. तसा अन्सारी कुटुंबीयांनी पुन्हा नालासोपारा येथील घरचा रस्ता धरला. पण भाड्याचे पैसे न भरल्याने घरमालकाने त्यांना तेथे राहण्यास मज्जाव केला. अखेर त्यांनी जंगलात आसरा घेतला.

सद्दाम यांच्याप्रमाणेच इतर शेकडो लोक डोंगरावर झोपड्या बांधून राहात आहेत. लॉकडाउनच्या काळात कोणी न कोणी आम्हाला जेवण देत होते. नंतर तेही बंद झाले. गावाहून मागवलेले पैसेही आता संपले आहेत, असे त्यांनी सांगितले. नालासोपारा येथील पेल्हार येथे राहणारा विकास सिंह आठवडा बाजारात कपडे विकून आपला उदरनिर्वाह करतो. त्याच्या कुटुंबात तीन सदस्य आहेत.

लॉकडाउन सुरू झाले तेव्हा त्याच्याकडे केवळ पाच हजार रुपये होते. याच ठिकाणी तो दोन हजार रुपये भाडे देऊन राहात होता. आता ते पैसेही संपले आहेत. गावाला जायचे आहे तर गाड्यांची सोय नाही. ट्रॅव्हल्सवाले ३-४ हजार रुपये मागतात. अखेर हतबल होऊन डोंगरावर झोपडी बांधून राहात असल्याचे विकास यांनी सांगितले.

एजंटकडूनही फसवणूक

अमित दुबे हा तरुण वसईतील एका कंपनीत काम करून तेथेच राहात होता. लॉकडाउननंतर मालकांनी एक महिना सांभाळ केला. नंतर पाच हजार देऊन गावाला जाण्यास सांगितले. त्यातील तीन हजार अमितने एका एजंटला दिले.

तो गावाला जाण्यासाठी पोलिसांकडून ट्रेनचा पास मिळवून देणार होता. यासाठी त्याच्याकडून फॉर्म भरून घेतला. पास कन्फर्म झाला की, आपल्याला मेसेज येईल, असे सांगितले. आता तो एजंटही टाळाटाळ करत आहे आणि उरलेले पैसेही संपल्याने अमितनेही आता डोंगरावर आश्रय घेतला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार