शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

वाड्यात सीएनजी पंप नसल्याने हेलपाटा; वाहनचालकांना जावे लागते भिवंडीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 00:17 IST

भिवंडी येथे जाताना शेलार येथे दररोज वाहतूक कोंडी होते. आधी या कोंडीचा सामना चालकांना करावा लागतो

वाडा : वाडा तालुक्यात सीएनजी गॅस पंप नसल्याने तालुक्यातील शेकडो वाहनचालकांना गाडीमध्ये सीएनजी भरायला ३० किलोमीटर अंतर कापून भिवंडी येथे जावे लागते. यामुळे वाहनचालकांचे आर्थिक नुकसान, तसेच वेळेचा प्रचंड अपव्यय होत असल्याने वाडा तालुक्यात सीएनजी पंप सुरू करण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

वाडा तालुक्यात सीएनजीवर चालणाऱ्या अनेक गाड्या आहेत. सरकारने काही गाड्या सक्तीने सीएनजीवर केल्या आहेत. मात्र, तालुक्यात सीएनजी पंपच नसल्याने या गाड्यांमध्ये सीएनजी भरण्यासाठी भिवंडी येथे जावे लागत आहे. भिवंडीशिवाय दुसरा जवळपास कुठेही सीएनजी पंप नसल्याने वाहनचालक-मालकांची प्रचंड गैरसोय होते. ३० ते ४० किलोमीटर अंतरावर भिवंडी शहर असल्याने वाहनचालकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे, तसेच भिवंडीत पोहोचेपर्यंत दीड ते दोन तास या प्रवासात जात असल्याने वेळेचाही अपव्यय होत असल्याचे चालकांनी सांगितले.

भिवंडी येथे जाताना शेलार येथे दररोज वाहतूक कोंडी होते. आधी या कोंडीचा सामना चालकांना करावा लागतो. त्यानंतर सीएनजी पंपावरही रांग लावावी लागते. या सगळ्यांमध्ये त्यांचा तासाभराचा वेळ वाया जातो. त्यामुळे चालक हैराण होत आहेत. त्यातच भिवंडी-वाडा महामार्गाची दुरवस्था झाली असून, यामुळे वाहनांचे नुकसानही होते. तालुक्यातील कुडूस-अंबाडी, कुडूस-कोंढले, कुडूस-उचाट, कुडूस-देवघर, कुडूस-नारे-वडवली, कुडूस-वाडा, कुडूस-खानिवली, वाडा-विक्रमगड, वाडा-परळी, खानिवली-कंचाड-गोऱ्हे, अंबाडी-चांबळे, लोहपे, अकलोली, केळठण, गणेशपुरी-निबवली-गोऱ्हाड, खानिवली-पालसई-असनस कंळभई, वाडा-सोनाळे-कळंभे आदी मार्गांवर सीएनजीवर चालणाऱ्या गाड्या प्रवाशांची वाहतूक करतात. सीएनजी भरल्यानंतर दोन-तीन दिवस पुरतो, त्यानंतर पुन्हा सीएनजी भरण्यासाठी जावे लागते. बाहेरचे भाडे घेतले तर एका दिवसातही सीएनजी संपतो, असे चालक म्हणतात. त्यामुळे तालुक्यातील मेट, कुडूस, खुपरी, वाडा, पाली, या ठिकाणी डिझेल व पेट्रोलपंप आहेत. या ठिकाणी सीएनजी पंपाला शासनाने परवानगी द्यावी, अशी वाहनचालकांची मागणी आहे.

सीएनजी गॅसची सोय वाड्यात नसल्याने प्रवासी वाहतूक करणाऱ्यांची गैरसोय होत आहे. यासाठी शासनाने लवकरात लवकर सीएनजी पंप तालुक्यात सुरू करावा. अन्यथा आम्हाला आंदोलन करून प्रशासन व सरकारचे लक्ष वेधावे लागेल.- शुभम गायकर, वाहनमालक

सीएनजी पंप वाडा तालुक्यात किंवा अंबाडी परिसरात नसल्याने आम्हा रिक्षावाल्यांची गैरसोय होत आहे. सीएनजी भरायला आम्हाला पहाटे पाच वाजता उठून भिवंडी गाठावे लागते. तेव्हाही रांगा लागलेल्या असतात. पंपावर वीज नसल्यास किंवा गॅस नसल्यास तासन्तास वाट पाहावी लागते. यामध्ये आमचे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच वेळेचाही अपव्यय होतो. यासाठी शासनाने वाडा तालुक्यात सीएनजी पंप सुरू करावा.- संदीप भोईर, रिक्षा मालक

टॅग्स :carकार