शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
4
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
5
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
6
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
7
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
8
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

वसई-विरार शहरांतील गोविंदांची विम्याकडे पाठ?, गतवर्षीपेक्षा नोंदणी कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 11:23 PM

गतवर्षी ४ हजार ८१९ गोविंदांनी आपली नोंदणी केली होती. त्यामुळे आताची आकडेवारी पाहिली तर या योजनेस गेल्या वर्षीच्या तुलनेत बराच कमी प्रतिसाद दिसून येत आहे.

- आशिष राणेवसई : दहीहंडी आता अवघ्या दोन दिवसांवर आली आहे. हा दहीहंडी उत्सव आणि त्यातील जोखीम तसेच जीवाचा धोका विचारात घेऊन त्यांना सुरक्षा कवच देण्यासाठी वसई - विरार महापालिकेने गोविंदांना मोफत विमा देण्याचे यंदा ठरवले आहे. परंतु पालिकेने याबाबत आवाहन केल्यानंतर बुधवार २१ आॅगस्टपर्यंत एकूण ३२ गोविंदा पथकांनी आपली नोंदणी केली आहे. हा आकडा गेल्यावर्षीपेक्षा थोडा कमी आहे. दरम्यान, शेवटच्या तारखेनंतरही आपण नोंदणी करून घेतो. त्यामुळे यंदाही ही संख्या नक्कीच वाढेल, अशी माहिती पालिकेच्या क्रीडा विभागाचे दिगंबर पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.गतवर्षी ४ हजार ८१९ गोविंदांनी आपली नोंदणी केली होती. त्यामुळे आताची आकडेवारी पाहिली तर या योजनेस गेल्या वर्षीच्या तुलनेत बराच कमी प्रतिसाद दिसून येत आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध गणेशोत्सव मंडळे, गोविंदा पथके दहीहंडी साजरी करण्यासाठी सज्ज झाली आहेत. उंचावरील मानाच्या हंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चढाओढ लागते. ही चढाओढ आणि हा थरार शनिवारी वसई-विरारमध्ये अनुभवता येणार आहे.उंचावरील हंड्या फोडताना गोविंदांना होणारे अपघात पाहता यंदाही गोविंदा पथकांसाठी वसई-विरार शहर महापालिका प्रशासनाने खास विमा योजनेस मंजुरी दिली. त्यानुसार पालिकेने वसई-विरारमधील गोविंदा पथकांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवाहन केले आहे.या योजनेचे स्वरूप काय आहेवसई-विरार महापालिकेतर्फे शहरातील नोंदणीकृत गोविंदा पथकांचा विमा नोंद केला जात आहे. यात अपघाती मृत्यू झाल्यास प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाला १० लाख, तर दोन अवयव किंवा दोन डोळे गमावल्यास १० लाख रु पये, तसेच एक हात, एक पाय किंवा एक डोळा निकामी झाल्यास ५ लाख, कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास १० लाख या विम्यातून देण्यात येणार आहेत.अपघातामुळे होणारा रुग्णालयाचा एक लाखांपर्यंतचा खर्च संबंधित विमा कंपनीतर्फे देण्यात येणार असल्याचे पालिकेने सांगितले. वसई-विरार महापालिकेच्या माध्यमातून गेल्या वर्षी नोंदणीकृत ४ हजार ८१९ गोविंदांनी विम्याची नोंद केली होती.परंतु यावर्षी २१आॅगस्टपर्यंत फक्त ३ हजार २०० गोविंदांच्या विम्याची नोंद झाल्याने ही आकडेवारी सध्या तरी अत्यल्प प्रतिसाद दर्शविते. त्यामुळे त्वरा करा शहरातील गोविंदांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन पुन्हा एकदा पालिकेच्या वतीने केले आहे.हा आकडा अत्यल्प वगैरे नाही अद्यापही दोन दिवस आहेत, अगदी सण उद्यावर आला आहे, तरी पालिका नोंदणी घेते. प्रत्यक्षात जे प्रोफेशनल गोविंदा आहेत ते गुरूपौर्णिमेपासून सराव सुरू करतात. अशा शेकड्यांनी नोंदणी आपल्याकडे वेळीच येतात. मात्र ज्यांना माहीत अथवा कल्पना नसते ते अखेरीस येतात.- दिगंबर पाटील, क्र ीडा विभाग, पालिका मुख्यालय, विरार

टॅग्स :Dahi Handiदहीहंडी