शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

अखेर तुळजापुरात सापडल्या नायगावच्या तिन्ही मुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2020 02:41 IST

स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी सोडली होती घरे

नालासोपारा : नायगावच्या चिंचोटी परिसरात राहणाऱ्या तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याचा गुन्हा शनिवारी वालीव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. या मुलींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली होती. अखेर त्या तिन्ही मुली वालीव पोलिसांच्या टीमला तुळजापुरात सापडल्या असून ३६ तासांत गुन्ह्याचा उलगडा केला आहे.

नायगावच्या चिंचोटी परिसरातील दळवीपाडा येथील भाबीपाडा चाळीत राहणारे मुन्नासिंग रामधनी चव्हाण (३९) यांची अल्पवयीन मुलगी कांचन (१२), तिच्या मैत्रिणी प्रियंका (१५) आणि कविता (१३) या घरातील कोणालाही काहीही न सांगता शुक्रवारी रात्रीच्या सुमारास निघून गेल्या होत्या. या प्रकरणी वालीव पोलिसांनी पथक स्थापन करून मुलींचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. मुलींचा तपास करताना एक मोबाइल नंबर पोलिसांना सापडला. त्या माहितीवरून पोलिसांनी टॅक्सी चालकाला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर मुलींना तुळजापूरला सोडल्याची महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक नवले आणि गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस हवालदार तोत्रे आणि कोकणी यांची टीम गेली होती. या मुलींचा फोटो घेऊन प्रत्येक ठिकाणी शोधाशोध सुरू केली. या तिन्ही मैत्रिणी एका हॉटेलमध्ये थांबल्या असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन तिन्ही मुलींना ताब्यात घेण्यात  आले.

तिघींनीही घरातून लांबवले पैसेn एका मुलीने घरातून २७ हजार, दुसऱ्या मुलीने १ लाख, तर तिसऱ्या मुलीने २० हजार अशी रोख रक्कम घेऊन लग्न न करता स्वत:च्या पायांवर उभे राहण्यासाठी घरातून जात असल्याची चिठ्ठी लिहून तिन्ही मैत्रिणी निघून गेल्या होत्या. सध्या तिन्ही मुलींना पोलिसांच्या टीमने ताब्यात घेतले असून त्यांच्या पालकांच्या ताब्यात देणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी ‌‘लोकमत’ला सांगितले.   

टॅग्स :Vasai Virarवसई विरार