शहरं
Join us  
Trending Stories
1
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
2
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
3
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
4
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
5
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... 
6
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
7
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
8
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
9
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
10
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
11
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
12
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
13
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
14
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
15
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
18
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
19
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
20
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार

समेळ पाड्यातील मुख्य खाडीवर भराव; पालिका कारवाई करणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 12:41 AM

नालासोपारा पुन्हा जलमय होणार

नालासोपारा : शहरातील पश्चिमेकडील भागातील पावसाळी पाण्याचा निचरा करणाऱ्या मुख्य खाडीवर (नाल्यावर) भराव टाकल्यामुळे नालासोपारा पुन्हा जलमय होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याच ठिकाणी बाजार भरवण्यात येणार असल्याचा फलकही लावण्यात आला होता. तो महापालिकेने काढला असला तरीही बिनधास्तपणे भरणी कशी काय करण्यात आली? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

गेल्या तीन-चार वर्षापासून पावसाळ्यात वसई तालुका जलमय होत आहे. पावसाळी पाण्याचा निचरा करणाºया खाड्या, मोठे नाले यांची पावसाळ्यापूर्वी सफाई करण्यात आली नाही. तसेच काही खाड्यांवर भराव टाकण्यात आल्यामुळे वसईकरांवर पूरस्थिती ओढवली होती. यानंतर वसई तालुका यापुढे जलमय होणार नाही, अशी ग्वाही आमदार हितेंद्र ठाकूर यांनी दिली होती. मात्र ठाकूर यांच्या या आश्वासनाला त्यांच्याच पदाधिकाऱ्यांनी गालबोट लावले असल्याचे बोलले जात आहे.

नालासोपारा पश्चिमेकडील मुख्य खाडीवर एका बांधकाम व्यावसायिकाने भराव टाकून आपल्या कार्यालयापर्यंत जाण्यासाठी रस्ता तयार केला आहे. या प्रकाराची माहिती देऊनही महापालिकेकडून कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. या जागेवर आठवडा बाजार आणि खाऊ गल्ली सुरू करण्याचे जाहीर करून तसा फलकही या ठिकाणी लावण्यात आला. यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

नालासोपारा पूर्व आणि पश्चिम तसेच विरारमधील पावसाळी पाण्याचा निचरा करणाºया समेळपाडा येथील या मुख्य खाडीवर सोपारा मुख्य रस्त्यावरील पुलापासून समेळपाडा नवीन स्मशानभूमीच्या पूर्व बाजूपर्यंत सुमारे दहा फूट रुंद आणि शंभर फूट लांबीचा भराव करण्यात आला आहे. त्यामुळे पावसाळ्यात नालासोपारा शहर जलमय होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत ई प्रभाग समितीचे सभापती अतुल साळुंखे यांची प्रतिक्रि या विचारण्यासाठी तीन वेळा फोन केला, परंतु त्यांनी फोन न उचलल्याचे त्यांची प्रतिक्रि या मिळू शकली नाही.

याबाबत मला माहिती मिळाल्यावर बाजाराचा लावण्यात आलेला बोर्ड काढून टाकला असून सदर ठिकाणी कोणी भरणी केली याचा शोध घेत आहे. ज्याने कोणी मातीची भरणी केली आहे त्याच्यावर कारवाई करणार आहोत. -रागेश राठोड, सहाय्यक आयुक्त,ई प्रभाग, वसई विरार महापालिका)

टॅग्स :Vasai Virarवसई विरार