शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

लॉकडाउनमुळे चिकू उत्पादकांना ७० कोटींची आर्थिक झळ; दहा हजार एकरवर लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 1:24 AM

कोरोनामुळे झाली निर्यात ठप्प; प्रक्रिया उद्योगासह अन्य फळलागवडीचा हवा पर्याय

- अनिरुद्ध पाटील।बोर्डी : डहाणू आणि तलासरी या तालुक्यात सुमारे दहा हजार एकरवर चिकू लागवड केली जाते. येथील चिकूला प्रचंड मागणी असते. मात्र, सध्या कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे चिकू निर्यात ठप्प झाली असून बागायतदारांचे सुमारे ७० कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज रुरल एंटरप्रुनर्स वेल्फेअर फाउंडेशन या संस्थेचे संस्थापक प्रभाकर सावे यांनी वर्तवला आहे.

चिकू प्रक्रिया उद्योग व्यवस्था असती, तर हे आर्थिक नुकसान काही प्रमाणात टाळता आले असते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जून २०१९ पासून चिकू फळावर मोठ्या प्रमाणावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. गतवर्षी पावसाचा कालावधी लांबला, चक्रीवादळामुळेही चिकूचे नुकसान झाले. नेहमी रमजान महिन्यात चिकूचा बाजारभाव हा सरासरी प्रतिकिलो २५ रुपये असतो. या वेळी कोरोनामुळे केवळ १० ते १५ टक्के मालाची विक्री आणि तीदेखील कमी दराने झाल्याने आर्थिक नुकसान सोसावे लागले. तर निर्यातीअभावी झाडावरील पक्व फळांची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली.

पालघर जिल्ह्यात या फळासाठी प्रक्रिया उद्योग नसल्याने फळांची नासाडी मोठ्या प्रमाणात होते. दीड वर्षापूर्वी तत्कालीन पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी ‘चिकू क्लस्टर-समूह’ गठित केला. या समूहातर्फे मोठे चिकू प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या आवाहनाला बागायतदारांचा प्रतिसाद लाभला होता. परंतु, त्यांच्या बदलीनंतर याकडे दुर्लक्ष झाल्याचे बागायतदारांचे म्हणणे आहे. शेतकºयांना स्वत:च्या बागायतीत चिकू प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी तिचे बिगर शेतीमध्ये रूपांतरित करणे आवश्यक आहे. मात्र नियमांचा हवाला देऊन महसूल विभागाकडून अपेक्षित सहकार्य नसल्याचा ठपका स्थानिकांकडून ठेवला जात आहे.

अल्कोहोलिक ब्रेव्हरेज आणि इतर मद्य पदार्थ बनवण्यासाठी काही उत्पादकांनी तयारी दर्शवली. मात्र मद्यावर २० टक्के वॅट रक्कम आगाऊ जमा करण्याची अट असल्याने हे भांडवल उभारणे बागायतदारांच्या आवाक्यातील नाही. त्यामुळेच या सर्व गोष्टींचा विचार केल्यास या कोरोना काळात आर्थिक नुकसानीचे प्रमाण हे कोटींच्या घरात गेल्याचा अंदाज या संस्थेने व्यक्त केला आहे. हे येथील प्रमुख फळ असल्याने याचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.

यंदा चिकूसह आंबा, लिची आदीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे जुन्या फळझाडांचे व्यवस्थापन करून तेथे टप्प्याटप्प्याने नवीन झाडांची लागवड करणे, नवीन फळांच्या जातीची झाडे लावण्याचा प्रयोग करणे गरजेचे आहे. याकरिता प्रशिक्षण व संशोधन यंत्रणा स्थानिक पातळीवर उभारणे गरजेचे झाले आहे. त्याचबरोबरीने समूह शेती- बागायतीचे प्रयोग करणे तसेच प्रक्रिया समूह निर्माण झाल्यास चिकूला होणाºया आर्थिक संकटावर मात करता येईल. - कृषिभूषण यज्ञेश सावे (चिकू बागायतदार)

टॅग्स :Vasai Virarवसई विरार