शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
3
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
4
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
5
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
6
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
7
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
8
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
9
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
10
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
11
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
12
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
13
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
14
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
15
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
16
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
17
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
18
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
19
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
20
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश

शाळाप्रवेशदिनीच मिळणार पुस्तके; १६ लाख ५ हजार १०९ पुस्तके मोफत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2018 2:23 AM

१ ली ते ८ वी इयत्तेच्या विद्यार्थ्याना शाळेच्या पाहिल्याच दिवशी समारंभपूर्वक नव्याकोर्या पाठ्यपुस्तकांचे मोफत वाटप सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत केले जाणार आहे.

- हितेन नाईकपालघर : १ ली ते ८ वी इयत्तेच्या विद्यार्थ्याना शाळेच्या पाहिल्याच दिवशी समारंभपूर्वक नव्याकोर्या पाठ्यपुस्तकांचे मोफत वाटप सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत केले जाणार आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागा मार्फत आठ तालुक्यांमधील ३ लाख ४ हजार ६८० विद्यार्थ्यांकरिता १६ लाख ५ हजार १०९ पाठ्यपुस्तकं उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिकचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी लोकमत ला दिली.गतवर्षी प्रमाणेच यंदाही शाळेच्या पाहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांंच्या हाती नवी कोरी पुस्तकं दिली जाणार असल्याने त्यांना खऱ्या अर्थाने आनंददायी शिक्षणाची प्रत्यक्ष अनुभूती मिळणार आहे. या मध्ये जिल्हा परिषद शाळा, शासकीय आश्रमशाळा आणि खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील १ ली ते ८ वी इयत्तांमधील विद्यार्थ्यांंचा समावेश असणार आहे. पालघर जिल्हयातील आठ तालुक्यांसाठी शिक्षण विभागाकडून गतवर्षी विविध विषयांच्या १६ लाख ९२ हजार ५७८ पुस्तकांची मागणी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाकडे करण्यात आली होती. तर त्या पैकी १६ लाख ४४ हजार ७११ पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात आली होती.तर या शैक्षणिक वर्षाकरिता ३ लाख ४ हजार६८० विद्यार्थ्यांकरिता १६ लाख ५ हजार १०९ इतका पाठ्यपुस्तकांची मागणी करण्यात आली आहे.पालघर तालुक्यातील १ ली ते ८ वी च्या ५० हजार ४८२ विद्यार्थ्यांकरिता २ लाख ७४ हजार २०३ पाठ्यपुस्तकें, वसई ६८ हजार २९८ विद्यार्थ्यांंकरिता ३ लाख ७४ हजार ७५९ पाठ्यपुस्तकं , डहाणू मध्ये ६७ हजार १८६ विद्यार्थ्यांकरिता, ३ लाख ४२ हजार ४४१ पाठ्यपुस्तकें, तलासरी मध्ये २९ हजार ८३६ विद्यार्थ्यांंकरिता १ लाख ५७ हजार ९३ पाठ्यपुस्तकं, जव्हार २१ हजार ३५२ विद्यार्थ्यांंकरिता १ लाख ८ हजार 645 पाठ्यपुस्तकं, मोखाडा मध्ये १४हजार ९७० विद्यार्थ्यांकरिता ७७ हजार ७३३ पाठ्यपुस्तकं , वाडा २७ हजार ७५४ विद्यार्थ्यांकरीता १ लाख ४४ हजार ९८१ पाठ्यपुस्तकं आणि विक्रमगड तालुक्यात २४ हजार ८३१ विद्यार्थ्यांंकरिता १ लाख २५ हजार ३१७ पाठ्यपुस्तक अशी संपूर्ण जिल्ह्यातील ३ लाख ४ हजार ६८० विद्यार्थ्यांंसाठी १६ लाख ५ हजार १०९ विविध विषयांच्या पाठ्यपुस्तकांचा समावेश आहे. तर गतवर्षी विक्र मगड तालुक्यात १ लाख ३८ हजार २५ , वाडा - १ लाख ५३ हजार ११२ , डहाणू-३ लाख ७९ हजार १५७ , मोखाडा -७० हजार ७३८, जव्हार -७६ हजार ९६९, वसई -३ लाख ८३ हजार ४८०, पालघर - २ लाख ७६ हजार ४४७, तलासरी -१ लाख ६६ हजार ७६५ अशी एकूण १६ लाख ४४ हजार ७११ इतकी सर्व विषयांची मिळून पाठ्यपुस्तकं उपलब्ध करून देण्यात आली होती.शाळांमधून पाठ्यपुस्तकं उपलब्ध होऊ लागल्याने विशेषत: गरीब आदिवासी पालकांचा आर्थिक फायदा होणार आहे. शिवाय पाल्याच्या शाळेत जाऊन शिक्षकांकडून पाठ्यपुस्तकांची यादी घ्या, त्यानंतर पुस्तकांच्या दुकानात जाऊन रांगेत उभे राहून घेतलेली पुस्तकं पुन्हा शाळेत जाऊन वर्गशिक्षकांना दाखवा हा पालकांचा त्रास आणि डोकेदुखी वाचणार आहे.जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके देण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र १ ली व ८ वी च्या वर्गाचा अभ्यासक्रम बदलल्याने नवीन पाठ्यपुस्तके उपलब्ध झाल्या नंतर तात्काळ त्याचे वाटप करण्यात येईल.- राजेश कंकाळ,शिक्षणाधिकारी, प्राथमिक

टॅग्स :Schoolशाळा