शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

आमलेवासीयांना भोगाव्या लागत आहेत मरणयातना...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 00:38 IST

दोन महिन्यांपूर्वी झालेल्या पावसामुळे गारगाई नदीवरून आमले गावाला जोडणारा पूल वाहून गेल्याने संपर्क तुटला आहे.

मोखाडा : दोन महिन्यांपूर्वी झालेल्या पावसामुळे गारगाई नदीवरून आमले गावाला जोडणारा पूल वाहून गेल्याने संपर्क तुटला आहे. मागील दीड ते दोन महिन्यांपासून या गावातील ग्रामस्थांना गावाबाहेर पडण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.
गावात एका ठिकाणी पूल आहे. परंतु दुसऱ्या ठिकाणी वन विभागाच्या विरोधामुळे पूलाचे खांब उभे करून अर्धवट अवस्थेत काम बाकी आहे. २०१४ पर्यंत पावसाळ्यात ग्रामस्थांना गावाबाहेर जाणे शक्य नव्हते. अगदी खूप आजारी रूग्ण असेल तर ग्रामस्थ डोलीतून ५ ते ६ किलोमीटरचे अंतर डोंगर चढून दवाखान्यापर्यंत घेऊन जायचे. या अर्धवट खांबाचा वापर करून ग्रामस्थ व आरोहन संस्थेच्या पुढाकाराने २०१४-१५ मध्ये साकव बांधण्यात आला होता. या साकवमुळे पावसाळ्यातही ग्रामस्थांना ये-जा करता येत होती.
मात्र अतिवृष्टीमुळे येथील भातशेती, भाजीपाला, मोगºयाची शेती वाहून गेल्यामुळे ग्रामस्थांचे नुकसान झाले. आमले येथील ४० कुटुंंब गेल्या ३ ते ४ वर्षापासून मोगरा शेतीमधून उत्पादन घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. सप्टेंबरपासून ते जून अखेरपर्यंत ५० ते ६० हजार रुपये मोगºयातून उत्पादन घेतात. अतिवृष्टीमुळे लोखंडी पूल वाहून गेल्यानंतर तातडीने पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या ठिकाणी भेट देऊन हा पूल पुन्हा उभारण्यात येईल, असे आश्वासन दिले मात्र, ते हवेतच विरले आहे.
>जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आमले गावातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ३ ते ४ वर्षांपूर्वी आरोहण संस्थेच्या माध्यमातून ४२ शेतकºयांनी मोगºयाची लागवड केली. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन त्यांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
-गणेश सरोदे, कार्यकर्ते, आरोहण
>गावातील वृद्ध महिला, रु ग्ण विद्यार्थी यांचा या नदीतील जीवघेणा प्रवास बघून या गावातील तरुणांनी लाकूड आणि पाण्याच्या टाक्या यापासून एक तरफा तयार केला आहे. याच तरफ्यावरून ग्रामस्थांची सध्या ये-जा सुरू आहे. लोखंडी पूल वाहून गेल्याने येथील तरुणांवर बेरोजगारी ओढवली आहे. गावात मोठ्या प्रमाणावर फुलांची लागवड होत असून तयार झालेले उत्पादन गावाबाहेर न्यायचा कसा हा प्रश्न येथील तरु ण शेतकºयांसमोर आहे.
- पांडुरंग वारे, स्थानिक
>पुरामध्ये लोखंडी पूल वाहून गेल्याने आमचा इतर गाव, तालुक्याशी संपर्क तुटला आहे. रूग्णांना जंगलातून डोली करून घेऊन जावे लागते.
-सोमनाथ किरकिरे,
पोलीस पाटील