शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

आमलेवासीयांना भोगाव्या लागत आहेत मरणयातना...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 12:38 AM

दोन महिन्यांपूर्वी झालेल्या पावसामुळे गारगाई नदीवरून आमले गावाला जोडणारा पूल वाहून गेल्याने संपर्क तुटला आहे.

मोखाडा : दोन महिन्यांपूर्वी झालेल्या पावसामुळे गारगाई नदीवरून आमले गावाला जोडणारा पूल वाहून गेल्याने संपर्क तुटला आहे. मागील दीड ते दोन महिन्यांपासून या गावातील ग्रामस्थांना गावाबाहेर पडण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.गावात एका ठिकाणी पूल आहे. परंतु दुसऱ्या ठिकाणी वन विभागाच्या विरोधामुळे पूलाचे खांब उभे करून अर्धवट अवस्थेत काम बाकी आहे. २०१४ पर्यंत पावसाळ्यात ग्रामस्थांना गावाबाहेर जाणे शक्य नव्हते. अगदी खूप आजारी रूग्ण असेल तर ग्रामस्थ डोलीतून ५ ते ६ किलोमीटरचे अंतर डोंगर चढून दवाखान्यापर्यंत घेऊन जायचे. या अर्धवट खांबाचा वापर करून ग्रामस्थ व आरोहन संस्थेच्या पुढाकाराने २०१४-१५ मध्ये साकव बांधण्यात आला होता. या साकवमुळे पावसाळ्यातही ग्रामस्थांना ये-जा करता येत होती.मात्र अतिवृष्टीमुळे येथील भातशेती, भाजीपाला, मोगºयाची शेती वाहून गेल्यामुळे ग्रामस्थांचे नुकसान झाले. आमले येथील ४० कुटुंंब गेल्या ३ ते ४ वर्षापासून मोगरा शेतीमधून उत्पादन घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. सप्टेंबरपासून ते जून अखेरपर्यंत ५० ते ६० हजार रुपये मोगºयातून उत्पादन घेतात. अतिवृष्टीमुळे लोखंडी पूल वाहून गेल्यानंतर तातडीने पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या ठिकाणी भेट देऊन हा पूल पुन्हा उभारण्यात येईल, असे आश्वासन दिले मात्र, ते हवेतच विरले आहे.>जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आमले गावातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ३ ते ४ वर्षांपूर्वी आरोहण संस्थेच्या माध्यमातून ४२ शेतकºयांनी मोगºयाची लागवड केली. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन त्यांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.-गणेश सरोदे, कार्यकर्ते, आरोहण>गावातील वृद्ध महिला, रु ग्ण विद्यार्थी यांचा या नदीतील जीवघेणा प्रवास बघून या गावातील तरुणांनी लाकूड आणि पाण्याच्या टाक्या यापासून एक तरफा तयार केला आहे. याच तरफ्यावरून ग्रामस्थांची सध्या ये-जा सुरू आहे. लोखंडी पूल वाहून गेल्याने येथील तरुणांवर बेरोजगारी ओढवली आहे. गावात मोठ्या प्रमाणावर फुलांची लागवड होत असून तयार झालेले उत्पादन गावाबाहेर न्यायचा कसा हा प्रश्न येथील तरु ण शेतकºयांसमोर आहे.- पांडुरंग वारे, स्थानिक>पुरामध्ये लोखंडी पूल वाहून गेल्याने आमचा इतर गाव, तालुक्याशी संपर्क तुटला आहे. रूग्णांना जंगलातून डोली करून घेऊन जावे लागते.-सोमनाथ किरकिरे,पोलीस पाटील