शहरं
Join us  
Trending Stories
1
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
2
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
3
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
4
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
5
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
6
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
7
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
8
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
9
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
10
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
11
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
12
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
15
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
16
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
17
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
18
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
19
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
20
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. शाळा झाल्या कोंडवाडे

By admin | Updated: July 24, 2014 23:59 IST

तळागाळातील गोर-गरिबांची मुले शिकून मोठी व्हावी, दर्जेदार शिक्षण त्यांना घेता यावे यासाठी सर्वशिक्षा अभियानातून भरमसाठ निधी खर्च करून शाळा इमारती चकाचक करण्यात आल्या़ शाळांत

अध्यापन नावापुरतेच : सहावीच्या विद्यार्थ्यांना लिहिता येते केवळ नावआकोली : तळागाळातील गोर-गरिबांची मुले शिकून मोठी व्हावी, दर्जेदार शिक्षण त्यांना घेता यावे यासाठी सर्वशिक्षा अभियानातून भरमसाठ निधी खर्च करून शाळा इमारती चकाचक करण्यात आल्या़ शाळांत संगणक आले; पण विद्यार्थ्यांना विशेष शिक्षण दिले जात नसून केवळ वर्गांमध्ये कोंबले जाते़ यामुळेच ग्रामीण विद्यार्थ्यांना अद्यापही शिक्षणात गोडी निर्माण झाली नाही़ याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे़पाचवी-सहावीच्या विद्यार्थ्यांना स्वत:च्या नावापलीकडे काही लिहता येत नाही. याची पडताळणी करायची झाल्यास अधिकाऱ्यांना ग्रामीण भागात यावे लागणार आहे़ शिक्षकांची अध्यापनातील रूची संपली असून शाळेत येण्याची आणि जाण्याची वेळ, हेच शिक्षकांचे काम झाले. प्रार्थनेनंतर विद्यार्थ्यांना वर्गात कोंबले की जबाबदारी संपली, असा प्रकार सुरू आहे़ पटावर हजेरी सर्वांची दिसत असली तरी निम्मे विद्यार्थी घरीच खेळत असल्याचे दिसते़ विद्यार्थ्यांना शिक्षणात गोडी निर्माण व्हावी म्हणून शासनाद्वारे विविध उपक्रम राबविले जातात; पण यंत्रणा ती केवळ कागदावरच राबविते़ यामुळे चवथीच्या विद्यार्थ्यांला ‘बे’चा पाढा येत नाही तर सातवीच्या विद्यार्थ्यांना ‘गुड मॉर्निंग’चे स्पेलींग येत नाही.शिक्षणाधिकारी, गटशिक्षण अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख अशी उतरंड असलेली व्यवस्था केवळ खुर्चीची शोभा वाढवित असून शैक्षणिक दर्जा मात्र जैसे थे दिसतो़ शाळा व्यवस्थापन नावाची कुचकामी समिती बुजगावणे झाले आहे. शाळेत काय शिजते याकडे या समितीच्या सदस्यांचे लक्षच जात नसल्याचे दिसते़ गलेलठ्ठ पगार असतानाही अध्यापनात रूची नाही. गोरगरीब माणूस पोटाला चिमटा घेऊन आपल्या पाल्यांना शिकवितात; पण त्यांच्या शिक्षणाची बोंबच दिसून येते़ प्राथमिक पायाच ठिसूळ झाला आहे. आठव्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बाराखडी शिकवावी काय, काहीच येत नाही हो! कोणत्या जंगलातून आले, असा सूर दिनकरनगर शाळेतील शिक्षकांचा होता़ नवीन शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षकांचे बोलणेच ऐकावे लागते़ यावरून जि.प. शाळांतून बाहेर पडणारी मुलांचे पुढील शैक्षणिक भवितव्य काय, हा प्रश्नच आहे़ शिक्षण विभाग व शिक्षक संघटनांनी याकडे लक्ष देत दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे़(वार्ताहर)