शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

वाघाच्या हल्ल्यात युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2019 6:00 AM

सायंकाळी सर्व जनावरे घराकडे परत गेली परंतु भुमेश घरी न परतल्याने परिवारातील सदस्यांना संशय आला. त्यामुळे गावातील शंभरावर गावकऱ्यांनी शेतशिवारात जाऊन शोध घेतला असता शेताच्या नाल्याजवळ भुमेशचा मृतदेह छिन्नविछिन्न स्थितीत आढळून आला. घटनेची माहिती कारंजा येथील वनविभाग व पोलिसांना देण्यात आली. लागलीच वनविभागाचे अधिकारी, ठाणेदार राजेंद्र शेटे व त्यांचे सहकारी यशवंत गोहत्रे घटनास्थळी दाखल झाले.

ठळक मुद्देआगरगाव शिवारातील घटना । नातेवाईकांसह नागरिकांचा आक्रोश

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : जनावरे सोडण्याकरिता शेतात गेलेल्या युवकावर दबा धरुन बसलेल्या वाघाने हल्ला चढवून त्याला ठार केले. ही घटना आगरगाव शिवारात शुक्रवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली. त्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयात आक्रोश करीत तत्काळ मृतकाच्या परिवाराला नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. यावेळी काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.भुमेश रमेश गाखरे (२२) असे मृत युवकाचे नाव आहे. तो नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी घरची जनावरे चारण्याकरिता शेतात गेला होता. जनावरे चारल्यानंतर शेतात बांधून तो जेवन करण्याकरिता दुपारी घरी परत आला. जेवन करुन चार वाजता पुन्हा जनावरे सोडण्याकरिता शेतात गेला असता दबा धरुन बसलेल्या वाघाने भुमेशवर अचानक हल्ला चढविला. यात तो जागीच गतप्राण झाला. सायंकाळी सर्व जनावरे घराकडे परत गेली परंतु भुमेश घरी न परतल्याने परिवारातील सदस्यांना संशय आला. त्यामुळे गावातील शंभरावर गावकऱ्यांनी शेतशिवारात जाऊन शोध घेतला असता शेताच्या नाल्याजवळ भुमेशचा मृतदेह छिन्नविछिन्न स्थितीत आढळून आला. घटनेची माहिती कारंजा येथील वनविभाग व पोलिसांना देण्यात आली. लागलीच वनविभागाचे अधिकारी, ठाणेदार राजेंद्र शेटे व त्यांचे सहकारी यशवंत गोहत्रे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करुन ग्रामीण रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.पण, येथील डॉक्टरांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिल्याने नागरिकांच्या आक्रोश वाढला. यावेळी स्थनिक लोकप्रतिनिधींनी रुग्णालयात धाव घेत डॉक्टरांना धारेवर धरल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी नातेवाईकांनी मृतकाच्या परिवाराला तत्काळ मदत आणि घरातील एका व्यक्तिला कायमस्वरुपी नोकरी देण्याची मागणी केली. त्यामुळे काही काळ वातावरण चांगलेच तापले होते.वाघाची दहशत कायमतालुक्यात मागील तीन महिन्यांपासून वाघाची दहशत कायम आहे. यापूर्वी धानोली येथील शेतकºयावर वाघाने हल्ला केला होता. तर दुसरी घटना सिंदीविहिरी येथे घडली.येथेही शेतकºयावर हल्ला केला पण ते थोडक्यात बचावले. आजची तिसरी घटना असून परिसरात वाघाने चांगलाच धुमाकूळ घातल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतीची कामे आता कशी करावी, असा प्रश्न शेकऱ्यांना पडला असून वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करावा अन्यथा होणाºया नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी गावकºयांनी केली आहे. 

टॅग्स :Tigerवाघforest departmentवनविभाग