शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

केळीच्या बागा करपल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 05:00 IST

गत तीन -चार वर्षापासून कुंदन वाघमारे या तरुण शेतकऱ्यानी आधुनिक तंत्रज्ञान वापरुन केळीचे पिक घेतले व चांगला नफा कमविला त्यांनीच परिसरात केळी पिकाचे तंत्र वाढावे म्हणून स्वखर्चाने कार्यशाळा घेवून परिसरातील शेतकऱ्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळवून दिल्याने केळीचे क्षेत्र वाढले.

ठळक मुद्देतापमान ४६ अंशांवर । पाने जळाली, घड कोसळून पडले

लोकमत न्यूज नेटवर्कपवनार : या संपूर्ण आठवड्यात उन्हाचा पारा वाढल्यामुळे केळी बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सतत किमान ४६ अंश तापमान केळीचे पिक सहन करु न शकल्याने ते वाळायला व धड आपोआप गळायला सुरुवात झाली आहे.एकेकाळी केळी पीक हे पवनारचे वैभव होते. तापमानात वाढ, बाजारभाव, भारनियमन, पाण्याची खालावलेली पातळी व अनेक कारणामुळे सदर पिक नामशेष झाले. परंतु गत तीन -चार वर्षापासून कुंदन वाघमारे या तरुण शेतकऱ्यानी आधुनिक तंत्रज्ञान वापरुन केळीचे पिक घेतले व चांगला नफा कमविला त्यांनीच परिसरात केळी पिकाचे तंत्र वाढावे म्हणून स्वखर्चाने कार्यशाळा घेवून परिसरातील शेतकऱ्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळवून दिल्याने केळीचे क्षेत्र वाढले. भावही बरा मिळू लागला परंतु या वर्षी अचानक तापमानात वृद्धी झाल्याने केळी बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. लॉकडाऊनमुळे भावही कमी मिळायला लागला आहे. कृषी विभागाने ताबडतोब पंचनामे करण्याची मागणी दुष्यंत खोडे, निलेश वाघमारे , इतर केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.केळीचा कॅलिफोर्निया सेलू तालुका झाला रिताखानदेशानंतर केळीसाठी प्रसिध्द असलेला भाग म्हणजे वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुका. तालुक्यातील प्रत्येक गावात केळी पिकांचे उत्पादन घेतले जात होते. देशाच्या विविध भागातून व्यापारी केळी खरेदीसाठी येथे येत होते. कालांतराने केळीची लागवड कमी होत गेली व हा कॅलिफोर्निया रिकामा झाला.

टॅग्स :Socialसामाजिक