शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
2
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
3
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
4
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
5
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
6
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
7
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
8
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
9
अनिल अंबानींच्या एडीए समूहावर छापा; 'सर्च वॉरंट'च्या आधारे कारवाईचा बडगा
10
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
11
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
12
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
13
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
14
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
15
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
16
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
17
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
18
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
19
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
20
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
Daily Top 2Weekly Top 5

नळयोजना रखडल्याने पाणी टंचाईचे सावट

By admin | Updated: December 1, 2014 22:59 IST

जि़प़ पाणी पुरवठा विभागाद्वारे गावे टंचाईमुक्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत़ यासाठी प्रत्येक गावात नळयोजना सुरू केली जात आहे़ समुद्रपूर तालुक्यातील गोविंदपूर येथेही नळयोजनेचे काम पूर्ण झाले आहे़

वर्धा : जि़प़ पाणी पुरवठा विभागाद्वारे गावे टंचाईमुक्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत़ यासाठी प्रत्येक गावात नळयोजना सुरू केली जात आहे़ समुद्रपूर तालुक्यातील गोविंदपूर येथेही नळयोजनेचे काम पूर्ण झाले आहे़ यास एक वर्षाचा कालावधी लोटला; पण नळयोजना सुरू झाली नाही़ केवळ रोहित्र न लागल्याने नळयोजना रखडल्याचे सांगितले जाते़ यामुळे ग्रामस्थांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे दिसते़
समुद्रपूर तालुक्यातील गोविंदपूर येथे बोअरवेलला पाणी लागत नाही़ सतत पाण्याची टंचाई भासत असल्याने जि़प़ पाणी पुरवठा विभागांतर्गत नळयोजना प्रस्तावित करण्यात आली़ यासाठी विहिरीचे बांधकाम, विद्युत मोटर, पाईपलाईन, वीज पुरवठ्यास लागणारे साहित्य, विजेचे खांब ही सर्व कामे पूर्ण करण्यात आली आहेत़ एक वर्षापूर्वी नळयोजनेचे संपूर्ण सोपस्कार पार पाडण्यात आले़ केवळ रोहित्र बसविणे शिल्लक राहिले होते़ या रोहित्रासाठी निधी नसल्याचे कारण पूढे केले जात आहे़ एक वर्षापासून काम पूर्ण होऊनही नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे़ नळयोजना पूर्ण होऊन नळाद्वारे पाणी मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करीत होते़ यासाठी एक वर्षापासून प्रतीक्षाही करीत आहेत; पण अद्याप ही योजना सुरूच झाली नाही़ केवळ रोहित्र नसल्याने नळयोजना रखडली आहे़ यामुळे नाईलाजाने ग्रामस्थांना बोअरवेल कराव्या लागत आहेत़
गोविंदपूर येथील अनेक ग्रामस्थांनी आपापल्या घरी बोअरवेल केल्या; पण पाणी लागले नाही़ १०० ते १५० फुट खोल खोदूनही पाणी लागत नसल्याने नागरिकांना अकारण भुर्दंड सोसावा लागत आहे़ सुनील हिवंज यांनीही काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरी बोअरवेल केली़ सुमारे दीडशे फुट खोदल्यानंतरही पाणीच लागले नाही़ यामुळे त्यांना ३० ते ३५ हजार रुपयांचा नाहक भुर्दंड सोसावा लागला़ गावातील नळयोजना सुरू झाली असती तर ग्रामस्थांना बोअरवेलचा खर्च करावा लागला नसता़ पाणी टंचाई असताना ग्रा़पं़ प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत़ विजेचे खांब, डीपी लावल्यानंतर केवळ रोहित्रासाठी वर्षभरापासून नळयोजना थंडबस्त्यात आहे़ प्रशासकीय स्तरावर यासाठी प्रयत्न होताना दिसत नसल्याने ग्रामस्थांत असंतोष पसरला आहे़ जि़प़ पाणी पुरवठा विभाग, ग्रा़पं़ प्रशासन व वीज कंपनीने कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे़़(कार्यालय प्रतिनिधी)