शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यात सूर्य कोपला; साडेतीन हजार हेक्टरवरील संत्राबागांना झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 09:48 IST

वर्धा जिल्ह्यात संत्राबागांना झळा

ठळक मुद्देपाणी टंचाईचा फटकाशेतकऱ्यांची बागा वाचविण्याकरिता धडपड सुरु

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कारंजा (घाडगे) तालुका हा दुष्काळग्रस्त असल्याने यावर्षीच्या उन्हाळ्यात तीव्रता चांगलीच वाढली आहे. परिणामी तालुक्यातील साडेतीन हजार हेक्टरवरील सत्रा बागा धोक्यात आल्या आहे. शेतकऱ्यांनी या बागांना वाचविण्याकरिता धडपड सुरु केली आहे.कारंजा तालुक्यात मोठ्या प्रमाणात संत्रा पीक घेतले जाते. येथील शेतकऱ्यांचे हे प्रमुख पीक असून या पिकांवरच शेतकऱ्यांचे आथिक बजेट अवलंबून आहे. या पिकामुळे शेतकऱ्यांना संपन्नता मिळाली तर परिसरातील मजुरांना मोठ्या प्रमाणात रोजगारही मिळतो. परंतु मागील दोन ते तीन वर्षांपासून पर्जन्यमानात झालेली घट व आधुनिक तंत्रज्ञानामुळे वाढलेला पाण्याचा उपसा यामुळे भूजल पातळी झपाट्याने खाली जात आहे. विहिरीसह कुपनलिकाही कोरड्या झाल्याने संत्रा बागा वाचविण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांपुढे उभे ठाकले आहे.तालुक्यात साडेतीन हजार हेक्टरवर संत्र्याची लागवड करण्यात आली आहे. या पिकांना जास्त पाणी लागत असल्याने बागायतदारांनी कुपनलिका केल्या. त्यामुळे उत्पादनात वाढ होऊन बागायतदारांना त्याचा बराच फायदा झाला. परंतु आता जलपातळी खालावल्याने पाणीप्रश्न निर्माण झाला आहे.मागील वर्षी झालेल्या अल्प पर्जन्यमानाने निर्माण झालेली ही दुष्काळी परिस्थिती बागायतदारांसाठी चिंता वाढविणारी ठरत आहे. गेल्या आठ दिवसापासून तापमानात वाढ झाल्याने विहीरी, कुपनलिका कोरड्या पडत आहे. एकीकडे पाण्याची टंचाई तर दुसरीकडे उन्हाच्या झळा यामुळे संत्राबागा वाळालयला लागल्या आहे.या लाखमोलाच्या बागा वाचविण्याकरिता बागायतदारांनी टँकरव्दारे पाणी विकत घेऊन झाडांना देण्याचा खटाटोप चालविला आहे. पण, या दुष्काळी परिस्थितीत टँकरचे दरही १ हजार रुपयाच्या वर गेल्याने विकतचे पाणी देणे बागायतदारांना न परवडणारे आहे. विकतचे पाणी किती दिवस देणार हा प्रश्न पडल्याने संत्रा बागायतदारांची चिंता दिवसेंदिवस वाढतच आहे. आतापर्यंत लाख रुपयाचे उत्पन्न देणारे झाडं डोळ्या देखत वाढत असल्याने बागायतदारांच्या डोळ्यात पाणी आली आहे. प्रशासकीय यंत्रणेकडून अद्यापही उपाययोजना न झाल्याने तत्काळ सुविधा पुरविण्याची मागणी बागायतदार शेतकऱ्यांकडून होत आहे.माझ्याकडे सात वर्षाची संत्रा बाग आहे. यावर्षी फळे येतील व केलेला खर्च निघून संसाराला आधार होईल, अशी आशा होती. परंतु दुष्काळाने त्यावर पाणी फेरले. संपूर्ण बागच पाण्याअभावी वाळून गेली.-पंकज मानकर, चंदेवाणीमाझ्या शेतावर २०० झाडांची फळबाग आहे. यावर्षी विहीर कोरडी झाल्याने संत्रा बाग वाळत आहे. संत्रा बाग वाचविण्यासाठी लागणारा खर्च कोठून करायचा हा प्रश्नच आहे.-पंजाबराव इंगळे, बागायदार, चंदेवाणीसंत्रा पिकांवर गेल्या दहावर्षापासून किडीच्या प्रमाणात वाढ होवूनही मोठ्या प्रमाणात खर्च करुन बागा वाचविल्या. परंतु यावर्षी पाणीच नसल्याने बागा डोळयादेखत वाळत आहे. त्यामुळे शासनाने बागा वाचविण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.-रवी पठाडे, बागायतदार, सेलगाव (लवणे)

टॅग्स :agricultureशेतीdroughtदुष्काळ