शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

पंढरपूरला जाणाऱ्या पालख्यांमधून विदर्भ बाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2020 5:00 AM

विदर्भातील कौंडण्यपूर येथील रुख्मिनी माता यांची पालखी पंढरपूरला दाखल झाली नाही तर पांडुरंगाचे दर्शन सुद्धा अपूर्ण मानावे लागेल, असा वारकऱ्यांच्या भावना आहेत. दरवर्षी पौर्णिमेला रुख्मिनी मातेची पालखी पांडुरंगाच्या मंदिरात नेली जाते. तेथे भगवंतातर्फे आई रुख्मिनी मातेला साडीचोळी देवून बोळवन केली जाते. त्यानंतर रुख्मिनी मातेच्या पादुका भगवंताच्या चरणाजवळ नेतात. तेथेच पाडुरंगाचे दर्शन घेतले जाते.

ठळक मुद्देवारकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर : पाच पालख्यांना परवानगी देण्याची मागणी

प्रमोद भोजने।लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पंत.) : कोरोना विषाणूच्या जागतिक महामारीमुळे यावर्षी पंढरपुरला जाणारा पायदळ दिंडी सोहळा रद्द करण्यात आला. मानाच्या सहा पालख्यांमधील पादुका व काही वारकऱ्यांना हेलीकॉप्टर, विमान किंवा वाहनाने पंढरपुरला नेण्याची शासनाने सहमती दर्शविली आहे. या निर्णयामुळे वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहेत.परंतु, या सहा पालख्यांमध्ये विदर्भातील एकाही पालखीचा समावेश नसल्याने विदर्भातील वारकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.विदर्भातील कौंडण्यपूर येथील रुख्मिनी माता यांची पालखी पंढरपूरला दाखल झाली नाही तर पांडुरंगाचे दर्शन सुद्धा अपूर्ण मानावे लागेल, असा वारकऱ्यांच्या भावना आहेत. दरवर्षी पौर्णिमेला रुख्मिनी मातेची पालखी पांडुरंगाच्या मंदिरात नेली जाते. तेथे भगवंतातर्फे आई रुख्मिनी मातेला साडीचोळी देवून बोळवन केली जाते. त्यानंतर रुख्मिनी मातेच्या पादुका भगवंताच्या चरणाजवळ नेतात. तेथेच पाडुरंगाचे दर्शन घेतले जाते. त्याचप्रमाणे रुख्मिनी माता संस्थान कौंडन्यपूर मठ, पंढरपूर येथील मठातून दररोज पांडुरंगाला नैवद्य सुद्धा दिला जातो. ही परंपरा गेल्या ४२५ वर्षापासून सुरु आहेत. मात्र, या परंपरेला यावर्षी कोरोनामुळे ब्रेक लागण्याची शक्यता आहे. यासोबतच विदर्भातील संत श्री गुलाबराव महाराज (माधान) भक्तिधाम चांदूरबाजार, संत भास्कर महाराज संस्थान, व संत वासुदेव महाराज संस्थान आकोट, संत शिवराम महाराज संस्थान, वरुड (जळका) येथीलही पालख्या दरवर्षी पंढरपुरला जात असतात. त्याचा शासनाने कुठेही उल्लेख केला नसल्याने या पाखल्यांची शेकडो वर्षाची परंपरा खंडीत न करता याही पालख्यांना पांडुरंगाच्या चरणी माथा टेकण्याची संधी द्यावी, अशी मागणी विदर्भातील वारकऱ्यांकडून केली जात आहे.शेकडो वर्षाच्या परंपरेचा विचार व्हावाशासनाने विदर्भातील वारकऱ्यांची शकडो वर्षांची परंपरा लक्षात घेता विदर्भातील रुख्मिनी माता संस्थान कौडन्यपूर, संत श्री गुलाबराव महाराज भक्तीधाम चांदुरबाजार, संत भास्कर महाराज संस्थान व संत वासुदेव महाराज संस्थान आकोट आणि संत शिवराम महाराज संस्थान वरुड (जळका) या पाच पालख्यांचा पंढरपुरला जाण्याची परवानगी द्यावी. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन फक्त २५ वारकरी वारी पूर्ण करतील. शासनाने जर परवानगी दिली नाही तर विदर्भातील वारकरी पाच पालख्यांमधील पादुका स्वत: च्या वाहनाने पंढरपुरला आणतील, असा इशारा युवा विश्व वारकरी सेनेच्या वतीने देण्यात आला आहे.लोकप्रतिनिधीसह अधिकाऱ्यांना साकडेविदर्भातील वारकऱ्यांच्या भावनांचा विचार करुन विदर्भातील पालख्यांना परवानगी द्यावी, याकरिता युवा विश्व वारकरी सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह गणेश महाराज शेटे, श्याम महाराज चौबे, मोहन महाराज मेतकर, राम महाराज गव्हारे, पुरुषोत्तम महाराज रौराळे, दिलीप खताळे, प्रकाश दिवे, दिवाकर किटे, मनोहर महाराज कायटे या वारकऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री यशोमती ठाकूर, ना.बच्चू कडू, पंढरपुरचे आमदार नाना भाळके, सोलापूरचे जिल्हाधिकारी व अमरावतीे विभागीय आयुक्त यांना निवेदनातून साकडे घातले आहेत.

टॅग्स :Pandharpurपंढरपूर