शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

४०१ परिचालकांवर बेरोजगारीचे संकट

By admin | Updated: September 10, 2015 02:42 IST

ग्रामपंचायतचे प्रशासन पारदर्शक होण्यासाठी शासनस्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येतात.

गौरव देशमुख वर्धाग्रामपंचायतचे प्रशासन पारदर्शक होण्यासाठी शासनस्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येतात. याच उपक्रमाचा भाग असलेल्या ई-पंचायत (संग्राम) योजनेंतर्गत ग्रामपंचायत कार्यालयात संगणक, प्रिंटर, युपीएस असे साहित्य देण्यात आले. याकरिता कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. शासनाकडून कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना केलेल्या कराराला मुदतवाढ देण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून कार्यवाही झाली नाही. यामुळे जिल्ह्यातील ४०१ संगणक परिचालक बेरोजगारीच्या वाटेवर आहेत.कर्मचाऱ्यांसोबतचा असलेला करार ३१ मार्च २०१५ ला संपणार होता. याला सहा-सहा महिन्यांपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. याकरिता १३ व्या वित्त आयोगातील उर्वरित निधीच्या वापरण्याची संमती राज्य शासनाने दिली होती. ३० सप्टेंबर २०१५ ला ही मुदत संपत आहे. त्यामुळे ४३३ ग्रामपंचायतीत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. सदर योजना महाआॅनलाईन कंपनीशी जोडण्यात आली आहे. योजनेवर जिल्हा प्रशासनाकडून देखरेख ठेवली जाते. या साहित्याकरिता शासनाने कंपनीसोबत करार केला होता. जिल्ह्यात या योजनेवर कोट्यवधीचा खर्च झाला; पण कर्मचाऱ्यांच्या भविष्यावर टांगती तलवार आहे. या योजनेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा शासनासोबत असलेला करार महिन्याअखेर संपत आहे. अद्याप कुठलेही ठोस पाऊस उचलेले गेले नसल्याची माहिती संगणक परिचालकांनी सांगितली. जिल्ह्यात ई-पंचायत योजनेमध्ये सरासरी ४३३ कर्मचारी कार्यरत आहे. यात दरमहा कामानुसार कर्मचाऱ्यांचे प्रमाण कमी-अधिक होत असते. यात ४०१ संगणक परिचालक आहेत. यात सात तालुका समन्वयक, हार्डवेअर इंजिनिअर ९ तर पंचायत समिती परिचालक १६ अशी एकूण संख्या ४३३ आहे; पण या महिन्याच्या अखेर आॅनलाईन कंपनीमार्फत केलेला कर्मचाऱ्यांचा करार संपत असल्याने ते कर्मचारी विवंचनेत आहे. यावर तोडगा काढून कामावर कायम ठेवण्याची मागणी आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता ग्राम विकास विभागामार्फत यावर उपाययोजना करून तोडगा काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अन्यथा उपासमारीची शक्यता वाढली आहे. याबाबत कार्यवाहीकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.