शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

टॉवर उभारणीला आता अडथळा नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 6:00 AM

जिल्ह्यात रिलायंन्स जीओ कंपनीकडून ४ जी टॉवर व एजी २ ऑफीसच्या बांधकामाला सुरुवात केली आहे.या बांधकामाकरिता उपविभागीय अधिकाऱ्यांकडून परवानगीही देण्यात आली आहे. मात्र, स्थानिक पातळीवर बऱ्याच अडचणी येत असल्याची तक्रार कंपनीने केली आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायतींना सूचना : मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींच्या हद्दीत मोबाईल टॉवर बांधकाम परवानगी देण्या संबंतधात उप विभागीय अधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. त्यामुळे उपविभागीय अधिकाऱ्यांनी मोबाईल टॉवर बांधकाम परवानगी दिल्यानंतर मोबाईल कंपनी बांधकामाला सुरुवात करु शकतात. त्यामुळे कोणत्याही ग्रामपंचायतीने मोबाईल कंपनीच्या टॉवर बांधकामाला अडथळा आणू नयेत, अशा सूचना मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी सर्व गटविकास अधिकाऱ्यांमार्फत ग्रामपंचायतींना दिल्या आहेत.जिल्ह्यात रिलायंन्स जीओ कंपनीकडून ४ जी टॉवर व एजी २ ऑफीसच्या बांधकामाला सुरुवात केली आहे.या बांधकामाकरिता उपविभागीय अधिकाऱ्यांकडून परवानगीही देण्यात आली आहे. मात्र, स्थानिक पातळीवर बऱ्याच अडचणी येत असल्याची तक्रार कंपनीने केली आहे. त्यामध्ये शहरालगतच्या साटोडा ग्रामपंचायत अंतर्गत आलोडी येथील सर्वे क्रमांक ४५/१ मधील प्लॉट क्रमांक ३२, ३३, ३४, ३५ वर एजी २ आॅफीसचे बांधकाम असून या बांधकामामध्ये स्थानिक रहिवासी अडथळा निर्माण करत असल्याची तक्रार कंपनीने केली आहे.तसेच काही ग्रामपंचायतींकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्यासही टाळाटाळ होत असल्याची तक्रार प्रशासनाकडे केली आहे. त्यामुळे सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंच व सचिवांची बैठक बोलावून मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी टॉवरच्या बांधकाम कोणताही अडथळा न अणता आपणास काही अडचणी असेल तर त्याची संविधानीक मार्गाने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी.टॉवरमुळे शरीरावर दुष्परिणाम होत असल्याचा नागरिकांचा गैरसमज आहे. याबाबत भारत सरकारने दिलेल्या पत्रानुसार जागतिक आरोग्य संघटनांच्या विविध सर्वेक्षणावरुन निघालेल्या निष्कर्षानुसार माबाईल टॉवर व लहरीचा आरोग्यावर दुष्परिणाम होत नसल्याचे स्पष्ट केले आहे.ही बाब स्थानिकांच्या लक्षात आणून देत टॉवर उभारणीच्या कामातील अडथळा दूर करण्याच्या सूचनाही ग्रामपंचायत प्रशासनाला दिल्या आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायत प्रशासनाची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

टॅग्स :Mobileमोबाइल