शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

शेतात संत्रा नाही, तरीही १२ हजारांची मदत

By admin | Updated: November 25, 2014 22:59 IST

अतिवृष्टी व अवकाळी पाऊस, गारपीटमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत अनुदानास्वरूपात देण्यासाठी कृषी विभागाच्या सहायकांनी सर्व्हे केला. या सदोष सर्वेमुळे पात्र शेतकरी डावलून

कृषी सहायकाचा कारभार: पात्र शेतकरी अनुदानापासून वंचित
अमोल सोटे - आष्टी (शहीद)
अतिवृष्टी व अवकाळी पाऊस, गारपीटमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत अनुदानास्वरूपात देण्यासाठी कृषी विभागाच्या सहायकांनी सर्व्हे केला. या सदोष सर्वेमुळे पात्र शेतकरी डावलून भलताच प्रकार उजेडात आला. तालुक्यातील रानवाडीमध्ये सरिता मनोहर सावरकर या महिला शेतकऱ्याच्या शेतात संत्रा नसतानाही तिला १२ हजार रुपयांची मदत देण्याचा अफलातून प्रकार कृषी विभागाने केला आहे.
जळगाव (बेलोरा) मधील शेतकरी विनोद पत्रे यांनी गारपीटीमुळे नुकसान झालेल्या गहू व चणा पिकाची भरपाई मागण्यासाठी कृषी विभागाकडे विचारणा केली. संबंधित अधिकाऱ्यांनी एकूण दहा शेतकऱ्यांची मदत इलाहाबाद बँक शाखा वर्धमनेरी येथे पाठविल्याची माहिती दिली. यानंतर शेतकरी नामदेव भातुकलाल, सरिता सावरकर, शंकर अजानकर, वासुदेव आजनकर, राजेंद्र डहाके, विलास भांगे, भीमराव भांगे, जनार्दन आजनकर आणि विनोद पत्रे हे सर्व शेतकरी विड्रॉल करण्यासाठी इलाहाबाद बँकेत गेले. मात्र तेथील अधिकाऱ्यांनी चुकीचा खाते क्रमांक कृषी विभागाने दिल्यामुळे आम्ही रक्कम देवू शकत नाही, असे सांगितले. याची खातरजमा करण्यासाठी शेतकरी विनोद पत्रे यांनी खाते क्रमांक तपासला यात कृषी अधिकाऱ्यांनी चुकीचा क्रमांक पाठविला असल्याचे यादीवरून सिद्ध झाले.
त्यानंतर सर्व शेतकरी तालुका कृषी अधिकारी विजय मेंढजोगे यांना भेटले. त्यांनी यादी दुरुस्त करण्याचे संबंधित कृषीसहायकाला सांगितले; परंतु यादी दुरुस्त झालीच नाही. त्यामुळे इलाहाबाद बँकेच्या अधिकाऱ्याने आष्टीच्या बँक आॅफ इंडियात यादी पाठविली. सदर यादीचा बँक आॅफ इंडिया शाखेशी संबंध नसल्याने व्यवस्थापकांनी खाते क्रमांक चुकीचा असून सर्व रक्कम कृषी विभागाच्या खात्यात परत पाठविली. तरीदेखील कृषी विभागाने परत इलाहाबाद बँकेला पत्र पाठवून रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा सल्ला दिला. यादी सदोष असल्यामुळे खात्यात पैसे जमा होवूच शकत नाही, असे बँक अधिकाऱ्यांनी ठणकाहून सांगितले. हा सगळा प्रकार सहा महिन्यापासून सुरू आहे. या बाबत जिल्हा कृषी अधीक्षक भाऊसाहेब बऱ्हाटे यांच्याकडे शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या; परंतु त्यावर काहीच कारवाई झाली नाही. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे झाले होते.