लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आय.एल.आय. सारीच्या सर्वेक्षणाचे काम वर्धा शहरात शिक्षक गेल्या २० दिवसांपासून करीत आहेत. असे असताना वर्धा न.प.च्या मुख्याधिकाऱ्यांनी वर्धा शहरातील कोणताही व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह मिळाला व त्याची नोंद संबंधित प्रगणक यांचेकडे नसल्यास कामात हयगय केल्याचे समजून निलंबनाची कार्यवाही करण्याचे आदेश ३१ जुलैला निर्गमीत केला आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष पसरला असून त्याविरूद्ध म.रा.शि.प. तक्रार निवारण समितीच्यावतीने अजय भोयर यांच्या नेतृत्वात नगराध्यक्ष अतुल तराळे यांना निवेदन देण्यात आले.सुरुवातीला सारीच्या सर्वेक्षणाचे काम १५ दिवसाचे आहे असे सांगण्यात आले. परंतु, २० दिवस उलटूनही सर्वेक्षणाचे काम सुरूच आहे. सर्वेक्षणाच्या कामात लावलेल्या शिक्षकांना प्रत्यक्ष कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. वास्तविक पाहता या सर्वेक्षणाची जबाबदारी आरोग्य विभागाची आहे. पण कोरोना संकट लक्षात घेऊन शिक्षक हे काम करीत आहेत. असे असतानाही मुख्याधिकारी निलंबनाच्या कारवाईची धमकी देत असल्याने शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे या कामावर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा घेण्याच्या मानसिकतेत सध्या शिक्षक असल्याचे अजय भोयर यांनी निवेदनातून स्पष्ट केले आहे.निवेदन देताना म.रा.शि.प. तक्रार निवारण समितीचे पुंडलिक राठोड, संजय बारी, देवेंद्र टेकाडे, संतोष महाजन, पुंडलिक नाकतोडे आदींची उपस्थिती होती.
सारीच्या सर्वेक्षणावर शिक्षकांचा बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2020 5:00 AM
सारीच्या सर्वेक्षणाचे काम १५ दिवसाचे आहे असे सांगण्यात आले. परंतु, २० दिवस उलटूनही सर्वेक्षणाचे काम सुरूच आहे. सर्वेक्षणाच्या कामात लावलेल्या शिक्षकांना प्रत्यक्ष कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. वास्तविक पाहता या सर्वेक्षणाची जबाबदारी आरोग्य विभागाची आहे. पण कोरोना संकट लक्षात घेऊन शिक्षक हे काम करीत आहेत.
ठळक मुद्देनगरपालिका मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशाने शिक्षकांमध्ये असंतोष