शहरं
Join us  
Trending Stories
1
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
2
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
3
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
4
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
5
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
6
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
7
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
8
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
9
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
10
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
11
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
12
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
13
प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप
14
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
15
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
16
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
17
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झालीय? घाबरू नका, 'या' सोप्या ट्रिकने तुमचे पैसे परत मिळणार!
18
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
19
कुत्र्यापासून वाघांना धोका; कान्हा व्याघ्र प्रकल्पात ‘T-141’ वाघिणीसह तिच्या चार बछड्यांचा मृत्यू
20
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाही दिनातील प्रत्येक तक्रारीची दखल घ्या

By admin | Updated: August 5, 2015 02:08 IST

जनतेने प्रशासनासंदर्भात असलेल्या तक्रारी अथवा गाऱ्हाणी प्रथम तालुकास्तरावरील लोकशाही दिनामध्ये दाखल करावी.

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : तक्रारकर्त्याला मिळणार माहिती
वर्धा : जनतेने प्रशासनासंदर्भात असलेल्या तक्रारी अथवा गाऱ्हाणी प्रथम तालुकास्तरावरील लोकशाही दिनामध्ये दाखल करावी. त्यानंतर तिथेही समाधान न झाल्यास जिल्हा लोकशाही दिनामध्ये तक्रार दाखल करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी नागरिकांना केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यातून आलेल्या विविध तक्रारींची दखल घेऊन त्यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी, तसेच तक्रारदाराला आपल्या तक्रारी संदर्भामध्ये केलेल्या कार्यवाहीची माहिती दिल्यास त्यांचे समाधान होईल. या दृष्टीने सर्व विभागप्रमुखांनी दखल घ्यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले. याप्रमाणे जिल्हा लोकशाही दिनामध्ये मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल झाल्या. प्रत्येक तक्रारीची चौकशी करुन संबंधित विभाग प्रमुखांकडून जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल मागितला आहे. यावेळी लोकशाही दिनामध्ये २८ तक्रारी दाखल झाल्या आहेत. लोकशाही दिनी सर्व विभागप्रमुखाने उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले. श्रम व पैसा खर्च करुन सामान्य जनता आपल्या तक्रारी जिल्हा प्रशासनासमोर मांडण्यासाठी येतात. त्यांच्या तक्रारीसंदर्भात समाधान करणे आवश्यक असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी उपस्थितांना सांगितले. जिल्हा लोकशाही दिनी यापूर्वी सादर झालेल्या परंतु अद्यापर्यंत निपटारा न झालेल्या तक्रारीचा सर्व विभागाने आढावा घ्यावा. या सर्व तक्रारी एक महिन्याच्या आत निकाली काढाव्या, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्यात. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मीणा, अपर जिल्हाधिकारी संजय भागवत, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)
२८ तक्रारी दाखल
लोकशाही दिनाच्या माध्यमातून प्रलंबीत तक्रारींचा तातडीने निपटारा करण्याचे निर्देश सर्व विभाग प्रमुखांना देण्यात आले.
नागरिक श्रम व पैसा खर्च करून येथे तक्रारी घेऊन येतात. त्यांचे समाधान होणे गरजेचे आहे. याशिवाय प्रलंबीत तक्रारींचा आढावा घेऊन त्या तातडीने निकाली काढण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.