शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
3
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
4
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
5
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
6
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
7
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
8
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
9
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
10
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
11
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
12
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
13
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
14
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
15
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
16
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
17
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
18
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
19
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
20
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वर्धेत ५२५ दुचाकींची विक्री

By admin | Updated: April 1, 2017 00:59 IST

प्रदूषणावर आळा बसविण्याचा उद्देश ठेवत न्यायालयाने बीएस ३ इंजिन असलेली वाहनांची विक्री आणि नोंदणी ३१ मार्चच्या सायंकाळपासून बंद करण्याचा निर्णय जाहीर केला.

बीएस ३ इंजिनची वाहने विक्री बंदच्या निर्णयाने दुचाकींच्या शोरूममध्ये गर्दी वर्धा : प्रदूषणावर आळा बसविण्याचा उद्देश ठेवत न्यायालयाने बीएस ३ इंजिन असलेली वाहनांची विक्री आणि नोंदणी ३१ मार्चच्या सायंकाळपासून बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. हा निर्णय होताच विविध कंपन्यांनी सदर इंजिन असलेल्या दुचाकींवर मोठ्या प्रमाणात सुट देत त्या विक्रीचा सपाटा सुरू केला. सवलतीची माहिती मिळताच नागरिकांनी विविध कंपन्यांच्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या शोरूममध्ये गर्दी केली. वर्धेत शुक्रवारी सायंकाळपर्यंत ५२५ दुचाकींची विक्री झाल्याची माहिती असून नोंदणी करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. न्यायालयाच्या निर्णयानुसार अशा वाहनांची आज केवळ विक्रीच नाही त्याची तर नोंदणीही करणे बंधनकारक आहे. १ एप्रिलपासून या वाहनांची विक्री अथवा त्याची नोंदणी होणार नाही, अशा सूचना न्यायालयाच्या आहेत. हा निर्णय जाहीर होताच डिलरकडे असलेल्या दुचाकी कंपनीने परत घेण्याकरिता नकार दिल्याने डिलरला ही वाहने विकणे बंधनकारक झाले. यामुळे वर्धेतील विविध कंपनीच्या शोरूमधील कर्मचाऱ्यांची ग्राहक सांभाळताना आणि त्यांच्या नोंदणीकरिता चांगलीच धावपळ दिसली. वर्धेत दुचाकींच्या एकूण १४ शोरूम वर्धा : वर्धेत विविध कंपनीचे एकूण १४ शोरूम आहेत. यात काही कंपनीचे दोन तर तीन शोरूमचा समावेश आहे. या शोरूमध्ये गुडीपाडव्याचा मुहूर्त साधत मोठ्या प्रमाणात वाहनांची मागणी करण्यात आली होती. डिलरच्या मागणीनुसार कंपनीने वाहनांचा साठा पाठविला. यातच गुडीपाडवा होताच न्यायालयाने बी ३ इंजिन असलेल्या गाड्यांमुळे प्रदुषणात होत असलेली वाढ कायम राहत असल्याचे म्हणत या गाड्या विक्रीवर बंदी आणली. यामुळे घाऊक व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. या निर्णयामुळे त्यांनी या गाड्या सुट देत विकण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक कंपनीच्या गाड्यांवर कमी अधिक रुपयांची सूट असल्याचे दिसून आले. मोपेडवर सहा ते सात हजार तर बाईकवर सात ते आठ हजार रुपयांची सूट असल्याचे दिसून आले. यामुळे बऱ्याच नागरिकांनी वाहनांची खरेदी केली.(प्रतिनिधी) ३० कारची विक्री न्यायालयाच्या निर्णयाने दोनचाकीच नाही तर चारचाकी वाहनांवरही बंदी आली. या बंदीचा लाभ उचलत वर्धेत तब्बल ३० चारचाही वाहनांची विक्री झाल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन विभागाने दिली. बीएस एक प्रदूषणाचे मानक बीएस म्हणजे भारत स्टॅडर्ड स्टेज इंजिनाच्या अंतर्गत वाहनामुळे होणाऱ्या प्रदूषणाच्या नियमनासाठी केंद्र शासनाने दिलेले हे एक मानक होय. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ हे त्यावर नियंत्रण ठेवते. बीएस मानक ही भारतात कार्यरत आहे. यानुसार वाहनांच्या इंजिनचा दर्जा ठरविल्या जातो. या दर्जानुसार भारतातील वाहने बीएस ३ इंजिनची आहेत. या वाहनांमुळे येथे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याचे समोर आले आहे. वाहनाच्या इंजिनामुळे होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याकरिता बीएस मानांकनात वेळोवळी सुधारणा करण्यात येते. ही सुधारणा करण्याकरिताच हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.