शहरं
Join us  
Trending Stories
1
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
2
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
3
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
4
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
5
Latest Marathi News LIVE: दाऊदचा 'खास' सलीम डोला याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
6
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
7
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
8
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
9
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
10
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
11
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
12
झाडावर कसा चढतो साप? व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क, तुम्ही कधी बघितलं का?
13
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
14
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
15
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
16
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
17
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
18
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
19
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
20
काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
Daily Top 2Weekly Top 5

पुलगावात व्यापार बंद ठेवून शहिदांना आदरांजली

By admin | Updated: June 2, 2016 00:42 IST

देशातील कारगील युध्दात शहीद झालेल्या शहरातील कृष्णा समरीत व सोहनसिंह पवार या दोन वीरांना शहरवासीयांनी भावपूर्ण वातावरणात निरोप दिल्यानंतर....

प्रभाकर शहाकार ल्ल पुलगाव (वर्धा)
देशातील कारगील युध्दात शहीद झालेल्या शहरातील कृष्णा समरीत व सोहनसिंह पवार या दोन वीरांना शहरवासीयांनी भावपूर्ण वातावरणात निरोप दिल्यानंतर पुन्हा परत एकदा शहरात आक्रोश, शोक, संवेदना व्यक्त करीत सोमवारी मध्यरात्री बॉम्बस्फोटातील शहिदांना पुलवासीयांनी बाजारपेठा बंद ठेवून आदरांजली अर्पण केली. शहरात ठिकठिकाणी शहिदांना भावपूर्ण श्रध्दांजलीचे फलक झळकत होते.
या आग व बॉम्बस्फोटाच्या घटनेत दोन लष्करी अधिकाऱ्यांसह शहरातील बाळासाहेब पाखरे, लिलाधर चोपडे, प्रमोद ऊर्फ बादल महादेव मेश्राम, अमित महादेव दांडेकर, अमोल येसनकर या पाच जणांना वीरमरण आले. मृतकांच्या परिवाराशी झालेल्या चर्चेनुसार शहीद झालेल्या वीरांचे मृतदेह ओळखण्यात अनेक अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले. प्रस्तुत प्रतिनिधीने सर्वच शहिदांच्या निवासस्थानाला भेट दिली असता अजूनही १० ते १२ कर्मचारी बेपत्ता असल्याची चर्चा यावेळी ऐकायला मिळाली. मंगळवारी रात्री दोन मृतदेह आढळले. घटनास्थळी असलेला अंधार व बॉम्बस्फोटाच्या आवाजाने झालेल्या पळापळीत अमित दांडेकर व अमोल येसनकर या दोघांचा घटनास्थळाजवळील पाण्याच्या टाकीत पडल्याने मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. त्यांना आधीच मृत घोषित करण्यात आले होते. मृतांमध्ये हिमाचल प्रदेशातील रविंद्र कुमार व राजेंद्रकुमार तसेच आर्वी पुनर्वसन गावातील शेखर बालसकर या तिघांचा अद्याप शोध लागला नसल्याचे समजते. घटनास्थळ परिसरातील दारूगोळा भांडाराचे शेड कोसळले. त्या खाली काही मृतदेह असण्याची शक्यता कर्मचारी व्यक्त करीत आहेत. भांडारच्या प्रवेशद्वारावर पत्रकार, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी, नातलगांसह शहरवासीयांनी एकच गर्दी होती.