शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

बोर व्याघ्र प्रकल्पात ५९ पाणवठे सज्ज

By admin | Updated: February 20, 2017 01:12 IST

बोर व्याघ्र प्रकल्पातील वन्य प्राण्यांची उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती होऊ नये म्हणून उपाययोजना करण्यात आल्यात.

आठ पाणवठे नैसर्गिक : २१ ठिकाणी सोलर व्यवस्थारितेश वालदे सेलू (बोरधरण)बोर व्याघ्र प्रकल्पातील वन्य प्राण्यांची उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती होऊ नये म्हणून उपाययोजना करण्यात आल्यात. यात प्राण्यांचा अधिवास असलेल्या परिसरातच पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण केली आहे. यासाठी वनविभागातर्फे नैसर्गिक, सोलर तसेच कृत्रिम, असे ५९ पाणवठे तयार करण्यात आले आहेत. या पाणवठ्यांमध्ये नियमितपणे पाणी पुरवठा करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. बोर तथा न्यू बोर व्याघ्र प्रकल्प १३८.१२ चौरस किलोमीटर परिसरात व्यापलेला आहे. राज्यातील जैविक विविधता आणि विपूल जलसंपदा यामुळे वन्य प्राण्यांची संख्या मोठया प्रमाणात या व्याघ्र प्रकल्पामध्ये आहे. उन्हाळ्यात वन्य प्राण्यांच्या जंगल क्षेत्रातच पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी बोर प्रकल्प आहे. सोबतच सोलर, कृत्रिम आणि नैसर्गिक, अशी ५९ पाणवठे या क्षेत्रात आहेत. यातील २१ पाणवठ्यांवर सोलर यंत्रणा बसविण्यात आल्याने दिवसभर सोलर पंपाद्वारे पाणवठ्यांत पाणी उपलब्ध होत आहे. आठ नैसर्गिक पाणवठ्यांत वर्षभर पाणी असते. इतर पाणवठ्यांवर टँकरद्वारे नियमित पाणी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे. बोर व्याघ्र प्रकल्पामध्ये जंगल क्षेत्रातच वन्य प्राण्यांच्या अधिवासाजवळच पाणवठ्याद्वारे पाणी उपलब्ध करून देण्यात आल्याने वन्यप्राण्यांची भटकंती थांबणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे. बोर व्याघ्र प्रकल्पातील दुर्मीळ प्रजातीच्या वन्य प्राण्यांसोबत पशु व पक्ष्यांसाठी जंगल क्षेत्रातच पाणी उपलब्ध झाले आहे. यासाठी वनक्षेत्र अधिकारी आर.पी. गायनेर व जी.एफ. लुचे तसेच वनरक्षक, वनकर्मचारी प्रयत्नरत असतात. बोर व्याघ्र प्रकल्पातील वन्य प्राणी भटकून ग्रामस्थांना त्रास होऊ नये म्हणून वन विभागाकडून उपाययोजना केल्या जात आहे. यामुळेच प्राण्यांचा अधिवासही वाढतीवरच असल्याचे दिसते.ग्रामस्थांचा उन्हाळ्यात प्राण्यांमुळे होणारा त्रास थांबणारजंगल क्षेत्रात वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्यास प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होते. जंगलातील प्राणी गावांमध्ये शिरून जनावरांसह प्रसंगी मानवावर हल्ले करतात. हे प्रकार टाळण्यासाठी जंगल क्षेत्रातच पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे असते. बोर व्याघ्र प्रकल्पामध्ये वन विभागाकडून ५९ पाणवठे तयार करण्यात आले आहेत. उन्हाळ्यात कधीही पाणी कमी होणार नाही, यासाठीही यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. परिणामी, प्राण्यांची भटकंती थांबून ग्रामस्थांचा त्रास दूर होणार असल्याचे सांगण्यात आले.