शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस कोमात अन् चोरटे जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 06:00 IST

आंजी (मोठी) येथील आर्वी-वर्धा मार्गावरील मास्टर कॉलनीतील सुरेश पांडुरंग खेडकर यांच्या कुलूप बंद घराला चोरट्यांनी टार्गेट केले. डुब्लीकेट चाबीचा वापर करून घरात प्रवेश केलेल्या चोरट्यांनी कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त केले. शिवाय रोख व सोन्याच्या दागिन्यांचा शोध घेतला. परंतु, त्यांच्या हाती काहीच लागले नाही.

ठळक मुद्देआंजी (मोठी), वायगाव (निपानी.), तळेगाव (श्या.पं.) मध्ये धाडसी चोरी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नजीकच्या वायगाव (नि.) येथील पाच दुकानांचे कुलूप तोडून तर आंजी (मोठी) येथे एका कुलूपबंद घराला टार्गेट करून अज्ञात चोरट्यांनी मुद्देमाल लंपास केला. इतकेच नव्हे तर चोरट्यांनी तळेगाव (श्या.पं.) नजीकच्या बहादरपूर शिवारातून कापूस चोरून नेला. या तिन्ही घटना मागील २४ तासांत घडल्याने कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या पोलीस विभागाच्या कार्यप्रणालीवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहे. शिवाय परिसरात चोरट्यांबाबतची दहशत निर्माण झाली आहे.आंजी (मोठी) येथील आर्वी-वर्धा मार्गावरील मास्टर कॉलनीतील सुरेश पांडुरंग खेडकर यांच्या कुलूप बंद घराला चोरट्यांनी टार्गेट केले. डुब्लीकेट चाबीचा वापर करून घरात प्रवेश केलेल्या चोरट्यांनी कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त केले. शिवाय रोख व सोन्याच्या दागिन्यांचा शोध घेतला. परंतु, त्यांच्या हाती काहीच लागले नाही.शेतातून परतल्यावर घराचे कुलूप उघडे दिसल्याने खेडकर यांनी घरात प्रवेश करून बारकाईने पाहणी केली असता चोरीचा प्रयत्न झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर घटनेची माहिती खरांगणा पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच आंजी (मोठी) पोलीस चौकीचे प्रभारी संतोष कामडी आणि त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. या घटनेची नोंद खरांगणा पोलिसांनी घेतली आहे. तर दुसरी घटना तळेगांव (शा.पं.) नजीकच्या बहादरपूर शिवारात घडली. अज्ञात चोरट्यांनी रविंद्र रमेश टर्के यांच्या शेतात प्रवेश करून शेतातील वेचणी करुन ठेवलेला सुमारे ८० किलो कापूस चोरून नेला. यामुळे शेतकरी टर्के यांचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी शेतकरी रविंद्र टर्के यांच्या तक्रारीवरून तळेगांव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.पाच दुकाने फोडलीवायगाव (नि.) : येथील पाच दुकानाचे कुलूप रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी फोडून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल चोरून नेला. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. प्रफुल झोटिंग, श्रीकांत पाल, दिलीप वांदाड यांच्या दुकानातून चोरट्यांनी मुद्देमाल पळविला. तर मेहबूब पान सेंटर आणि बछु भाई हॉटेल या दुकानातून खाद्य पदार्थांसह रोख रक्कम चोरून नेली. एकाच रात्री पाच दुकाने फोडल्याने गावात चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे. चोरीची माहिती मिळताच वायगाव पोलीस चौकीच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून बारकाईने पाहणी केली. या प्रकरणी देवळी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Thiefचोर