शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

केवळ १४०० क्विंटल सोयाबीनची आवक

By admin | Updated: October 21, 2014 22:55 IST

दिवाळीच्या काळात जिल्ह्यातील कृषी बाजार समितीत सोयाबीन व कापूस येत असल्याचा आतापर्यंतचा इतिहास आहे. यंदा मात्र तसे नसल्याचे वास्तव आहे. दिवाळीचे दिवस सुरू झाले असताना जिल्ह्यातील

२७०० ते ३२०० चा दर : दिवाळीत बाजार समिती बंद वर्धा: दिवाळीच्या काळात जिल्ह्यातील कृषी बाजार समितीत सोयाबीन व कापूस येत असल्याचा आतापर्यंतचा इतिहास आहे. यंदा मात्र तसे नसल्याचे वास्तव आहे. दिवाळीचे दिवस सुरू झाले असताना जिल्ह्यातील केवळ एकमेव हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीत आतापर्यंत केवळ १ हजार ४०० क्विंटल सोयाबीन आले आहे. यामुळे यंदा शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.आवक कमी असूनही सोयाबीनला मिळणारा भाव अत्यल्प असल्याचे दिसून येत आहे. या बाजारसमितीत आलेल्या सोयाबीनला दोन हजार ७०० ते तीन हजार २०० रुपये क्विंटलचा दर मिळाला आहे. यामुळे यंदा सोयाबीनपासून शेतकऱ्यांना विशेष लाभ होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीनकडे पाहिले आहे. यंदा मात्र तसे होणार असल्याचे चित्र नाही. सोयाबीनवर आलेल्या पैशाच्या आधारावर कुटुंबाची दिवाळी साजरी करण्याची शेतकऱ्यांची आशा सध्या मावळली आहे. शिवाय सोयाबीन विकून त्यातून आलेल्या पैशावर रबी हंगामाची तयारी करण्याची मनीषा बाळगून असतो, मात्र यंदा तीही धुळीस मिळाली आाहे. जिल्ह्यात यंदाच्या खरीपात कपाशीपेक्षा सोयाबीनचा पेरा अधिक झाला आहे. सोयाबीनवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची भिस्त असताना निसर्गाच्या लहरीपणाचा त्याला चांगलाच फटका बसला. पाऊस उशिरा आल्याने पेरण्या उशिरा झाल्या. याचा विपरीत परिणात उत्पन्नावर झाला. वेळोवेळी पावसाने दिलेल्या दग्यामुळे सोयाबीनचा आकार ज्वारीच्या दाण्यासारखा झाला. यामुळे त्याला बाजारात दर मिळेल अथवा नाही याची चिंता शेतकऱ्यांना पडली आहे. काही भागात उत्पन्न येणार नसल्याची स्थिती आल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनची सवंगणी करण्याचेही टाळले आहे. काही ठिकाणी सोयाबीनची तोडणी करण्यात येत असल्याचे चित्र आहे. अशीच स्थिती कपाशीची आहे. पाऊस उशिरा आल्याने पेरण्याही उशिरा झाल्या. परिणामी दसऱ्याचा कापूस खरेदीचा मुहूर्त फसला. दिवाळीपूर्वी कापूस बाजारात येईल असे वाटत असताना यंदा तेही होत नसल्याचे चित्र आहे. दिवाळी तोंडावर आली असताना शेतातील कापूस अद्याप घरीच नसल्याने तो बाजारात येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या कारणाने कापसावर दिवाळी करण्याची आशा मावळली आहे.(प्रतिनिधी)