शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
'पोलिसांनी त्याची हत्या केली...'! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
3
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
4
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
5
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
6
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
7
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
8
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
9
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
10
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
11
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
12
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
13
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
14
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
15
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
16
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
17
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
20
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन

ढगाळ हवामानामुळे कांदा पीक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 5:00 AM

काही शेतकऱ्यांनी उन्हाळी कांद्याचे महागडे बियाणे आणून टाकले होती. परंतु, या ढगाळ वातावरणामुळे कांद्याचे रोप व लावलेल्या कांद्याची पाल पिवळी पडून करपू लागली आहेत. शेतकरी बुरशीजन्य औषधाची फवारणी करीत आहेत. पालीवर करपा आणि गाभ्यामध्ये माव्यासारख्या रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

ठळक मुद्देपिके पडली पिवळी : करपा रोगानेही घातले थैमान, शेतकरी अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पंत.) : वातावरणात सातत्याने होत असलेल्या बदलामुळे शेतातील पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागल्याने परिसरातील शेतकरी चिंतातुर झाला आहे. शेतातील पीक वाचविण्यासाठी औषधांची फवारणी करीत पिके वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केल्यानंतर औषधांची फवारणी करून कांदा पिकात सुधारणा झाली होती. परंतु, या ढगाळ वातावरणामुळे कांद्याची पाल पिवळी पडून त्याच्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे.काही शेतकऱ्यांनी उन्हाळी कांद्याचे महागडे बियाणे आणून टाकले होती. परंतु, या ढगाळ वातावरणामुळे कांद्याचे रोप व लावलेल्या कांद्याची पाल पिवळी पडून करपू लागली आहेत. शेतकरी बुरशीजन्य औषधाची फवारणी करीत आहेत. पालीवर करपा आणि गाभ्यामध्ये माव्यासारख्या रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस व जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ज्या शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली होती, त्या शेतकऱ्यांचा कांदा निघाला असून काहींची काढणी सुरू आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे वाहतूक ठप्प आहे. परिणामी, अनेकांचा काढणी करून ठेवलेला कांदा शेतातच पडून आहे. तर काही शेतकऱ्यांनी कांदा लागवड १५ जानेवारीपासून ते फेब्रुवारी महिन्याच्या शेवटपर्यंत केली आहे. त्या शेतकºयांची कांदा जगविण्यासाठी धडपड सुरु आहे.परीसरात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे असून सध्या सगळीकडे अशीच परिस्थिती आहे. कांदा पिकावरच काही शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक गणित अवलंबून असल्यामुळे शेतकरी सध्या कांदा जगविण्यासाठी धडपड करत असल्याचे चित्र सगळीकडे पाहायला मिळत आहे. तर काही शेतकरी कांदा निघूनही कोरोनामुळे सर्व ठप्प असल्यामुळे आर्थिक संकटात सापडला आहे.

टॅग्स :onionकांदाagricultureशेती