शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
3
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
4
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
5
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
6
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
7
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
8
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
9
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
10
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
11
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
12
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
13
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
14
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
15
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
16
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
17
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
18
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
19
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
20
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्याची गरज

By admin | Updated: March 31, 2017 02:01 IST

निसर्गाची महत्त्वाची देण पाणी असून त्याचा प्रत्येक थेंब वाचविण्याची गरज आहे. यासाठी गावकऱ्यांनी सामूहिकरित्या श्रमदानातून प्रयत्न करणे गरजेचे आहे,

पोपटराव पवार : पाणी फाऊंडेशनकडून जनजागृतीपर कार्यक्रमआर्वी : निसर्गाची महत्त्वाची देण पाणी असून त्याचा प्रत्येक थेंब वाचविण्याची गरज आहे. यासाठी गावकऱ्यांनी सामूहिकरित्या श्रमदानातून प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत महाराष्ट्र शासनाच्या आदर्श गाव कार्यक्रमाचे संचालक पोपटराव पवार यांनी येथे व्यक्त केले.प्रसिद्ध सिनेनट अमीर खान यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘सत्यमेव जयते वाटर कप’च्या माध्यमातून पाणी फांउडेशनच्यावतीने गुरूवारी येथील सहकार मंगल कार्यालयात जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी प्रकाश शर्मा तर अतिथी म्हणून तहसीलदार विजय पवार, गटविकास अधिकारी सरिता पवार आदी उपस्थित होते. पवार पूढे म्हणाले की, पाणी हे जीवन आहे. मानवालाच नव्हे तर प्राण्यांनाही दिलेली ही अमूल्य देण आहे. याचे योग्य पद्धतीने नियोजन होणे गरजेचे आहे. एकेकाळी पाण्याने समृद्ध झालेली गावेच्या गावे योग्य नियोजन न झाल्याने पाण्याच्या अभावाने उजाड झालेली दिसून येतात. भविष्यात पाणी ही मूळ समस्या ठरल्यास नवल राहणार नाही. याचे भान ठेवून सिनेमा, नाटक एवढेच नव्हे तर तमाशाच्या कलावंतांनी पाणी समस्येमुळे निर्माण होणाऱ्या स्थितीवर भाष्य करून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. असाच प्रयत्न अमिर खान यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या सत्यमेव जयते वाटर कपच्या माध्यमातून पाणी फांउडेशनच्यावतीने करण्यात येत आहे. यासाठी सुमीत वानखेडे यांच्या आग्रहावरून नागपूर विभागातून केवळ आर्वी तालुक्याची निवड झाली आहे. आपले गाव समृद्ध व आदर्श बनविण्याकरिता पाणी फांउडेशनच्या कार्यकर्त्यांना मदत करा, असे आवाहन त्यांनी केले.याप्रसंगी नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे, पं.स. सभापती शिला पवार, उपसभापती धर्मेंद्र राऊत, शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश देशमुख, हृदय रोगतज्ज्ञ डॉ. अरुण पावडे, डॉ. रिप्पल राणे, डॉ. सचिन पावडे, प्रा. रवींद्र सोनटक्के, प्रशांत नेपटे, शंकर राठोड तथा ५२ गावातील सरपंच व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. संचालन मंदार देशपांडे यांनी केले तर आभार तहसीलदार पवार यांनी मानले. कार्यक्रमाला कुणाल परदेशी, रितेश लुणावत, कडू व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)