शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

महाबळा-इटाळा मार्गाची वाहतूक दोन तास ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 05:00 IST

खरीप हंगामाला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा आहे. कपाशी व सोयाबीनच्या पेरण्या सुरू आहे. सेलू व लगतच्या परिसरात तुरळक पावसाच्या सरी येत आहे. मात्र, महाबळा परिसरात झालेल्या दमदार पावसाने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी दुपारी आलेल्या पावसाने पुलावरील डांबरीकरण खरडून गेले असून पुलावर मोठे खड्डे पडले आहे.

ठळक मुद्देनाल्याला आला पूर : पूल उंच करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : तालुक्यातील महाबळा व लगतच्या परिसरात रविवारी दुपारच्या सुमारास दमदार पाऊस झाल्याने महाबळा ते इटाळा रस्त्यावर असलेल्या नाल्याला पूर आल्याने पावसाचे पाणी पुलावरून वाहू लागल्याने आजनगाव, धपकी, दहेगावकडे जाणारी दोन्ही बाजूची वाहतूक तब्बल दोन तास ठप्प होती. पाणी ओसरल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.खरीप हंगामाला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा आहे. कपाशी व सोयाबीनच्या पेरण्या सुरू आहे. सेलू व लगतच्या परिसरात तुरळक पावसाच्या सरी येत आहे. मात्र, महाबळा परिसरात झालेल्या दमदार पावसाने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी दुपारी आलेल्या पावसाने पुलावरील डांबरीकरण खरडून गेले असून पुलावर मोठे खड्डे पडले आहे. नाल्याला पूर आल्याने नाल्यावरील रस्त्यावरून ओसंडून पाणी वाहत असल्याने पुलावरून जाणारी दोन्हीकडील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे नाल्याच्या काठावर अडकलेल्या शेतकरी, शेतमजूर व समृद्धीच्या कामावरील कामगारांना घरी पोहचण्यास विलंब झाला. महाबळा ते इटाळा मार्गावर असलेल्या पुलावर पावसाळयात नेहमीच पुराचे पाणी ओसंडून वाहते. त्यामुळे रहदारीची अडचण होते. हा पूल उंच करण्याच्या मागणीसाठी सरपंच जोत्स्ना पोहाणे यांनी गावकऱ्यांना सोबत घेत अनेकदा संबंधितांकडे विनंती केली. पण, त्यांच्या विनंती अर्जाला केराची टोपली दाखविण्यात आली. पावसाळयाला सुरूवात झाली असून आगामी काळात दमदार पाऊस झाल्यास याचा त्रास परिसरातील शेतकऱ्यांना सोसावा लागणार आहे. प्रशासनाने याची दखल घेत तत्काळ या पुलाची उंची वाढविण्याची गरज आहे.पूलाची उंची वाढवामहाबळा ते इटाळा मार्गावरील असलेल्या नाल्यासमोर यावर्षी बंधाºयाचे बांधकाम झाले. त्यामुळे पुलावरून नेहमीच पाणी वाहते. सिमेंट पाईपचा हा पूल असून रस्ता खचून रस्त्यावरील डांबरही पावसाच्या पाण्याने वाहून गेले. त्यामुळे आगामी काळात महाबळा ते इटाळा हा रस्ता शेतकºयांसाठी बंद होण्याची भीती आहे. संबंधित विभागाने पुलाची उंची वाढविल्यास नेहमीच्या त्रासातून सर्वांची सुटका होईल.

टॅग्स :Rainपाऊस