शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

वीज भारनियमनाने रात्र शेतातच..!

By admin | Updated: November 8, 2014 22:43 IST

परिसरात वीज वितरण कंपनीने भरदिवसा भारनियमन आणि रात्रीचा वीजपुरवठा देणे सुरू केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीला घरी झोपण्याऐवजी शेतात काडीकचऱ्यात पिकांना ओलीत

रोहणा : परिसरात वीज वितरण कंपनीने भरदिवसा भारनियमन आणि रात्रीचा वीजपुरवठा देणे सुरू केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीला घरी झोपण्याऐवजी शेतात काडीकचऱ्यात पिकांना ओलीत करण्यासाठी जावे लागत आहे. रात्रीचे ओलीत करण्यासाठी मजूरवर्गही मिळत नसल्याने शेतमालकाला स्वत: रात्रीच्यावेळी ओलीत करण्याची वेळ आली आहे. सविस्तर वृत्त असे की, दोन महिन्याआधी रोहणा परिसरात सोमवार, मंगळवार आणि बुधवार या तीन दिवशी रात्री पावणे बारा ते सकाळी पावणे दहा या वेळात तर गुरुवार ते रविवार या चार दिवशी सकाळी पावणे दहा ते सायंकाळी पावणे सहापर्यंत विद्युत पुरवठा केल्या जात होता. त्यामुळे आठवड्यातील चार दिवस दिवसा तर तीन दिवस सकाळी शेतकरी ओलीत करु शकत होते. दरम्यान वीजवितरण कंपनीने बळीराजाला ओलिताची फार गरज असताना भारनियमन दोन तासांनी वाढविण्याचा निर्णय घेतला. सदर निर्णयाची अंमलबजावणी करताना शेतकऱ्यांना दिवसा अधिकाधिक पुरवठा देण्याऐवजी दिवसाचा वेळ भारनियमनात समाविष्ट करून सोमवार ते बुधवार रात्री पावणे बारा ते सकाळी पावणे आठ यावेळात तर गुरुवार ते रविवारी सकाळी पावणे अकरा ते सायंकाळी पावणेसहा यावेळात विद्युत पुरवठा देणे सुरू केले. त्यामुळे सोम, मंगळ व बुधवार सकाळी पावणे आठ लाच लाईन जात असल्याने हे तीन दिवस ओलीत करणे शक्य होत नाही.याविरूद्ध शेतकऱ्यांनी ओरड केली असता स्थानिक कनिष्ठ अभियंत्याने हा बदल दोन तीन दिवसांसाठीच आहे. लवकरच जुन्याप्रमाणेच विद्युत पुरवठा करण्यात येणार असल्याची थाप मारून शेतकऱ्यांच्या विरोधाची धार कमी केली. पण दोन महिन्याचा काळ उलटला तरी वाढीव भारनियमन कमी करण्यात आले नाही. तसेच सोमवार ते बुधवारला रात्री पावणे बाराऐवजी पावणे दोनला विद्युत पुरवठा सुरू करुन सकाळी पावणे दहापर्यंत विद्युत पुरवठा चालू ठेवला तरी दोन तासांचे वाढीव भारनियमन होते व सकाळी दोन ते तीन तास शेतकरी ओलीतही करू शकतो. पण हा पर्याय देखील कंपनीने स्वीकारला नाही.कंपनीची मानसिकता शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी सुखाने घरी झोपू द्याची नसल्याने अनेक शेतमालकांना आठवड्यातील तीन दिवस रात्रीला ओलीत करावे लागते. शेतात अंधार असतो. जमिनीला भेगा पडल्याने या भेगात सरपटणारे प्राणी असतात. पिकात गवत वाढलेले असते अशावेळी जमिनीतील भेगात पाणी जाताच सरपटणारे प्राणी बाहेर येतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना उत्पन्न होवो अथवा न होवो आम्हाला वाढीव मजुरी द्या अशा मजुरांच्या मानसिकतेमुळे रात्रीला ओलीतासाठी मजूर मिळत नाही. अशा बिकट परिस्थितीत स्वत: शेतमालकाला रात्रीच्या वेळी ओलीतासाठी शेतावर जाण्या शिवाय पर्याय उरला नाही. मान्सून परतीचा पाऊस न आल्याने खरीपातील कापूस, तूर व रब्बीतील गहू व चणा या पिकांना ओलिताची खूप गरज आहे. पण चारही बाजूने आर्थिक कोंडीत सापडलेल्या बळीराजाला विद्युत वितरण कंपनीने कोंडीत पकडण्याच्या मानसिकतेमुळे शेतकरी वैतागला आहे. शेतात सरपटणाऱ्या प्राण्यांशिवाय जंगली श्वापदांचा हैदोसही होत असल्याने जीवितास धोका वाढला आहे. या कारणाने शेतात जागली करण्यासाठी शेतकऱ्यांना मचान बांधून त्यावर रात्र काढावी लागून ओलित करावे लागत आहे. वीजवितरणने शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा व्यवस्थित केल्यास त्यांना रात्रभर शेतात जागली करण्याची वेळ येणार नाही. परंतु वितरणच्या अशा धोरणामुळे शेतकरी पुरता वैतागला आहे. आधीच उत्पादनाची हमी नसल्याने शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेत भारनियमन कमी करण्याची मागणी आहे.(वार्ताहर)