शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

जिल्ह्यातील सत्तरी पार वृद्धांना कोविड विषाणू बनवितोय भक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2020 5:00 AM

दिवाळीच्या तोंडावर विविध साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठेत एकच गर्दी केली होती. त्यानंतर सध्या नवीन कोविड बाधित सापडण्याची गती वाढली आहे. एकट्या नोव्हेंबर महिन्याचा विचार केल्यास ३० दिवसांत जिल्ह्यात १,५७१ नवीन कोविड बाधित आढळले. तर १,३२२ रुग्ण कोविडमुक्त झाले असले तरी तब्बल ३७ व्यक्तींचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे, हे विशेष.

ठळक मुद्देसावधान; दिवसेंदिवस वाढतोय जिल्ह्यातील कोविड मृतांचा आकडा

वर्धा : नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे २४९ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. यात सर्वाधिक ६१ ते ८० वयोगटातील व्यक्तींचा समावेश आहे. कोविडची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात असून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पाश्वभूमीवर सदर वयोगटातील व्यक्तींनी आपले आरोग्य जपण्याची गरज आहे. कोविड संकट मोठे असून दक्ष राहण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देत आहेत. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. असे असले तरी सध्या स्थितीत वर्धेकर गाफिल असल्यागत वागत आहेत. इतकेच नव्हे तर दररोज नवीन कोविड बाधित सापडण्याची गती सध्या वाढली असून दिवसेंदिवस कोविड मृतकांच्या संख्येतही वाढ होत असल्याने नागरिकांनी जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. मंगळवारपर्यंत जिल्ह्यात ७ हजार ८९१ व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याने निदान झाले आहे. त्यापैकी ७ हजार १६७ व्यक्ती कोविडमुक्त झाल्या आहे.

३७ व्यक्तींचा नोव्हेंबर मध्ये झाला मृत्यू

दिवाळीच्या तोंडावर विविध साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठेत एकच गर्दी केली होती. त्यानंतर सध्या नवीन कोविड बाधित सापडण्याची गती वाढली आहे. एकट्या नोव्हेंबर महिन्याचा विचार केल्यास ३० दिवसांत जिल्ह्यात १,५७१ नवीन कोविड बाधित आढळले. तर १,३२२ रुग्ण कोविडमुक्त झाले असले तरी तब्बल ३७ व्यक्तींचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे, हे विशेष.

कोरोनाने बुधवारी घेतला ७० वर्षीय महिलेचा बळी बुधवार २ डिसेंबरला वर्धा तालुक्यातील रहिवासी असलेल्या एका ७० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आज एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने जिल्ह्याची कोविड मृतकांची संख्या आता २५१ झाली आहे. जिल्ह्यात सध्या ४८७ ॲक्टिव्ह कोविड पॉझिटिव्ह आहेत.

शहरी भागात कोविड  मृतांची संख्या जास्तच मंगळवार १ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील तब्बल २५० व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून त्यापैकी एका व्यक्तीचा इतर आजाराने मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागांकडून सांगण्यात येते.  कोरोना मृतांची जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असून शहरी भागात कोविड मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यात शहर पातळीवर प्रभावी जनजागृतीसाठी विशेष मोहीम हाती घेण्याची गरज आहे. विशेष म्हणजे प्रत्येक मृतकांची जिल्ह्यात कोविड चाचणी केली जात आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या