शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
3
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
4
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
5
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
6
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
7
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
8
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
9
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
10
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
11
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
12
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
13
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
14
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

हिंगणघाटचा गौरव अव्वल

By admin | Updated: June 9, 2015 02:30 IST

शैक्षणिक जीवनात पहिली परीक्षा म्हणून महत्त्व असलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेचा म्हणजेच दहावीचा निकाल

जिल्ह्याचा निकाल ८५.९५ टक्के : १९ हजार ५१५ पैकी १६ हजार ७७३ विद्यार्थी उत्तीर्णवर्धा : शैक्षणिक जीवनात पहिली परीक्षा म्हणून महत्त्व असलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेचा म्हणजेच दहावीचा निकाल सोमवारी आॅनलाईन जाहीर झाला. यात जिल्ह्याचा निकाल ८५.९५ टक्के लागला आहे. बारावीच्या निकालाप्रमाणे दहावीच्या निकालातही जिल्ह्यात मुलींनीच बाजी मारली. निकाल आॅनलाईन असल्याने विद्यार्थ्यांनी शाळेसह इंटरनेट केंद्रांवर गर्दी केली होती. जिल्ह्यातून पहिला येण्याचा मान यंदा हिंगणघाट येथील सेंट जॉन हायस्कूलच्या गौरव अरुण काचोळे याने पटकाविला आहे. त्याने ९७.८० टक्के (४८९) गुण घेतले. तर द्वितीय क्रमांक वर्धेच्या अग्रगामी हायस्कूलच्या अपूर्व प्रवीण उपदेव याने मिळविला. त्याला ९७.६० टक्के (४८८) गुण आहे. जिल्ह्यात मुलींमधून प्रथम येण्याचा मान अग्रगामी हायस्कूलच्या वृषाली विजय मसने हिने पटकाविला आहे. तिला ९८.४० टक्के (४८७) गुण मिळाले आहे. तर याच शाळेची साक्षी राजेंद्र कुळकर्णी हिने ९७.२० टक्के ($४८६)गुण घेत चवथा क्रमांक मिळविला. आठही तालुक्यातील २६८ शाळांतून १९ हजार ५१५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात ९ हजार ९०९ मुले तर ९ हजार ६०६ मुलींचा समावेश आहे. त्यापैकी १६ हजार ७७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ८ हजार २०३ मुले उत्तीर्ण झाले असून त्यांची टक्केवारी ८३.७८ टक्के आहे. तर ८ हजार ५७० मुली उत्तीर्ण झाल्या असून त्यांची टक्केवारी ८९.२२ टक्के आहे. यंदाच्या परीक्षेत जिल्ह्यातील २१ शाळांनी १०० टक्के निकाल दिला. जिल्ह्यातील शाळेचा विचार केल्यास १९ हजार ५७३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. त्यापैकी ५८ विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अर्ज भरला नाही. उर्वरीत विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यांचा निकाल जाहीर झाला. सर्वाधिक निकाल वर्धा तालुका ८९.२० टक्के तर सर्वात कमी निकाल आष्टी (शहीद) तालुक्याचा ८०.६१ टक्के लागला आहे. हिंगणघाट तालुक्याच्या निकालाची टक्केवारी ८६.६९ इतकी आहे. आर्वी तालुक्याचा निकाल ८३.४२ टक्के लागला. देवळी तालुक्याच्या निकालाची टक्केवारी ८६.२३ इतकी आहे. कारंजा तालुक्याचा निकाल ८४.७१ टक्के लागला. समुद्रपूर तालुक्याच्या निकालाची टक्केवारी ८६.५४ असून सेलू तालुक्याचा निकाल ८०.८४ टक्के लागला आहे.(प्रतिनिधी)पहिल्या चारमध्ये केवळ एका गुणाचा फरक ४दहावीचा निकाल आज जाहीर झाला. या निकालात गौरव काचोळे याने ४८९ गुण घेत जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान पटकाविला. दुसरा क्रमांक अपूर्व उपदेव याने ४८८ गुण घेत पटकाविला. जिल्ह्यात प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यात केवळ एका गुणाचा फरक आहे. हाच एका गुणाचा फरक तिसऱ्या व चवथ्या क्रमांकाकरिताही कायम राहिला. जिल्ह्यात तृतीय क्रमांकासह मुलींमधून पहिली आलेल्या वृषाली मसने हिने ४८७ गुण घेतले. तर चवथ्या क्रमांकावर असलेल्या साक्षी कुळकर्णी हिला यापेक्षा एक गुण कमी म्हणजेच ४८६ गुण मिळाले. यामुळे जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत एका गुणाचा फरक महत्त्वाचा ठरला.