शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
2
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
3
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
4
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
5
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
6
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
8
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
9
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
10
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
11
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
12
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
13
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
14
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
15
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
16
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
17
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
18
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
19
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
20
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका

हिंगणघाटचा गौरव अव्वल

By admin | Updated: June 9, 2015 02:30 IST

शैक्षणिक जीवनात पहिली परीक्षा म्हणून महत्त्व असलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेचा म्हणजेच दहावीचा निकाल

जिल्ह्याचा निकाल ८५.९५ टक्के : १९ हजार ५१५ पैकी १६ हजार ७७३ विद्यार्थी उत्तीर्णवर्धा : शैक्षणिक जीवनात पहिली परीक्षा म्हणून महत्त्व असलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेचा म्हणजेच दहावीचा निकाल सोमवारी आॅनलाईन जाहीर झाला. यात जिल्ह्याचा निकाल ८५.९५ टक्के लागला आहे. बारावीच्या निकालाप्रमाणे दहावीच्या निकालातही जिल्ह्यात मुलींनीच बाजी मारली. निकाल आॅनलाईन असल्याने विद्यार्थ्यांनी शाळेसह इंटरनेट केंद्रांवर गर्दी केली होती. जिल्ह्यातून पहिला येण्याचा मान यंदा हिंगणघाट येथील सेंट जॉन हायस्कूलच्या गौरव अरुण काचोळे याने पटकाविला आहे. त्याने ९७.८० टक्के (४८९) गुण घेतले. तर द्वितीय क्रमांक वर्धेच्या अग्रगामी हायस्कूलच्या अपूर्व प्रवीण उपदेव याने मिळविला. त्याला ९७.६० टक्के (४८८) गुण आहे. जिल्ह्यात मुलींमधून प्रथम येण्याचा मान अग्रगामी हायस्कूलच्या वृषाली विजय मसने हिने पटकाविला आहे. तिला ९८.४० टक्के (४८७) गुण मिळाले आहे. तर याच शाळेची साक्षी राजेंद्र कुळकर्णी हिने ९७.२० टक्के ($४८६)गुण घेत चवथा क्रमांक मिळविला. आठही तालुक्यातील २६८ शाळांतून १९ हजार ५१५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात ९ हजार ९०९ मुले तर ९ हजार ६०६ मुलींचा समावेश आहे. त्यापैकी १६ हजार ७७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ८ हजार २०३ मुले उत्तीर्ण झाले असून त्यांची टक्केवारी ८३.७८ टक्के आहे. तर ८ हजार ५७० मुली उत्तीर्ण झाल्या असून त्यांची टक्केवारी ८९.२२ टक्के आहे. यंदाच्या परीक्षेत जिल्ह्यातील २१ शाळांनी १०० टक्के निकाल दिला. जिल्ह्यातील शाळेचा विचार केल्यास १९ हजार ५७३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. त्यापैकी ५८ विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अर्ज भरला नाही. उर्वरीत विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यांचा निकाल जाहीर झाला. सर्वाधिक निकाल वर्धा तालुका ८९.२० टक्के तर सर्वात कमी निकाल आष्टी (शहीद) तालुक्याचा ८०.६१ टक्के लागला आहे. हिंगणघाट तालुक्याच्या निकालाची टक्केवारी ८६.६९ इतकी आहे. आर्वी तालुक्याचा निकाल ८३.४२ टक्के लागला. देवळी तालुक्याच्या निकालाची टक्केवारी ८६.२३ इतकी आहे. कारंजा तालुक्याचा निकाल ८४.७१ टक्के लागला. समुद्रपूर तालुक्याच्या निकालाची टक्केवारी ८६.५४ असून सेलू तालुक्याचा निकाल ८०.८४ टक्के लागला आहे.(प्रतिनिधी)पहिल्या चारमध्ये केवळ एका गुणाचा फरक ४दहावीचा निकाल आज जाहीर झाला. या निकालात गौरव काचोळे याने ४८९ गुण घेत जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान पटकाविला. दुसरा क्रमांक अपूर्व उपदेव याने ४८८ गुण घेत पटकाविला. जिल्ह्यात प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यात केवळ एका गुणाचा फरक आहे. हाच एका गुणाचा फरक तिसऱ्या व चवथ्या क्रमांकाकरिताही कायम राहिला. जिल्ह्यात तृतीय क्रमांकासह मुलींमधून पहिली आलेल्या वृषाली मसने हिने ४८७ गुण घेतले. तर चवथ्या क्रमांकावर असलेल्या साक्षी कुळकर्णी हिला यापेक्षा एक गुण कमी म्हणजेच ४८६ गुण मिळाले. यामुळे जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत एका गुणाचा फरक महत्त्वाचा ठरला.