शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची पराभवाची हॅटट्रिक; दिल्ली कॅपिटल्सच्या विजयासह प्लेऑफ्सच्या शर्यतीत नवं ट्विस्ट
2
अबुधाबीमध्ये मोठा ड्रोन हल्ला; न्यूक्लियर प्लँट नष्ट करण्याचा प्रयत्न; पुन्हा युद्धाचे ढग?
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान; ठरला ३१वा जागतिक पुरस्कार!
4
DC vs RR: विक्रमी अर्धशतकानंतर रियान परागचा रुबाब; सेलिब्रेशनमुळे नवा वाद, नेमकं काय घडलं?
5
रेल्वे ठेकेदारच्या हलगर्जीपणामुळे अडकली कुत्र्यांची पिल्ले, कसारा यार्डमधील विचित्र प्रकार
6
निसर्गाचा मोठा चमत्कार! भीषण ST बस अपघातात ६ महिन्यांची गरोदर महिला सुखरूप
7
'दर्जे'दार! पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा
8
ना 'डील', ना ठोस आश्वासन... डोनाल्ड ट्रम्प चीनवरून रिकाम्या हाती परतले, आता पुढे काय करणार?
9
ठाणे: मिठबंदर खाडीत बेपत्ता व्यक्तीचा शोध अखेर थांबवला; चार दिवसांपासून सुरू होते शोधकार्य
10
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
11
युक्रेनचा मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका भारतीय कामगाराचा मृत्यू, ३ जखमी
12
Vaibhav Suryavanshi Record : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी भारताचा नवा सिक्सर किंग! अभिषेक शर्माचा विक्रम मोडला
13
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
14
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
15
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
16
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
17
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
18
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
19
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
20
शनि अमावस्येच्या रात्री दोघांची हत्या; धुळ्यात भोंदू बाबाचं कृत्य, सगळं केलं पण एका चुकीने अडकला
Daily Top 2Weekly Top 5

चार ग्रा.पंं. भाजपा तर तीन काँग्रेसच्या ताब्यात

By admin | Updated: April 19, 2016 05:54 IST

तालुक्यातील सात ग्रामपंचायतीची निवडणूक होऊ घातली होती. यात मिर्झापूर ग्रामपंचायत अविरोध झाल्याने उर्वरीत सहा

आर्वी : तालुक्यातील सात ग्रामपंचायतीची निवडणूक होऊ घातली होती. यात मिर्झापूर ग्रामपंचायत अविरोध झाल्याने उर्वरीत सहा ग्रामपंचायतीकरिता रविवारी मतदान झाले. त्याची मतमोजणी सोमवारी झाली असून यातील मिर्झापूर, पिपरी पुनर्वसन, मांडला, सर्कसपूर या चार ग्रा.पं.वर भाजपाने तर हैबतपूर, अहिरवाडा, जाम पुनर्वसन येथे काँग्रेसने बहुमत प्राप्त केले आहे.
मिर्झापूर ग्रामस्थांनी निवडणूक न घेण्याचा निर्णय घेऊन संगीता कोल्हे, बाळासाहेब सोनटक्के, अर्चना जाधव, प्रमिला भांगे, नंदू निघोट, सविता कठाणे, पद्मा मुंद्रे, सुरेश काळपांडे यांना अविरोध घोषित केले. सर्कसपूर येथे दिगंबर सोलव, प्राची निखाडे, राणी गोरले, निखिल कडू, वंदना सहारे, पुंडलिक सरोदे, समदुरा राऊत यांची अविरोध निवड झाली.
अहिरवाडा येथे पंजाब नत्थूजी कोकोटे, सुषमा रोशन मंगाम, छाया गणेश गायकवाड, प्रदीप हरिश्चंद्र फाले, अरुणा त्र्यंबक कसर, संजय दादाराव इथापे, मनीषा अशोक कोल्हे निवडूण आले. पिपरी पुनर्वसन शैलेश मारोतराव तलवारे, उर्मिला विनोद डोळे, शेख नासीर शेख अमिर, करूणा मात्रे, कविता राजेंद्र शिरगरे, प्रशांत गणेश सलाम, शेवंता अशोक धुर्वे निवडून आल्या.
जाम पुनर्वसन येथे नंदा ठाकरे, मनीष माहुरे, शंकर चव्हाण, नरेश बडगे, शालिनी दहिवाडे, संगीता बाळसकर, राजेंद्र ठाकरे निवडून आले. मांडला येथे बबन परतेकी, उमेश परतेकी, रेखा कंगाली, संध्या लांडगे, बबीता धुर्वे, रवी कळसकर, अर्चना इंगळे निवडून आले.
हैबतपूर येथे राहुल राऊत, सीमा पाटील, अनसूया निखाडे, स्वप्नील कयलके, शालिनी चातरकर, अनिल गडलिंग, पद्मा भांगे यांची निवड झाली.
भाजपाचे विधानसभा प्रमुख विजय बाजपेयी यांच्या कार्यालयासमोर माजी आमदार दादाराव केचे यांच्या उपस्थितीत विजयी उमेदवारांनी जल्लोष साजरा केला. तर काँग्रेसच्यावतीने आ. अमर काळे यांच्या निवास्थानीही विजयी उमेदवारांनी जल्लोष साजरा केला. या गावात आता सरपंचपद कुणाला मिळेल याकडे साऱ्याचे लक्ष लागले आहे.(शहर प्रतिनिधी)

आंजीत संचेरिया गटाचे वर्चस्व कायम
आंजी (मोठी) : स्थानिक वॉर्ड क्र. १ मधील ग्रामपंचायत सदस्याने दिलेल्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेकरिता रविवारी पोटनिवडणूक झाली. यात सरपंच जगदीश संचेरिया यांच्या जनशक्ती पॅनलचे अशोक बोरसरे विजयी झाले.
या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत जगदीश संचेरिया यांच्या गटाने १५ पैकी १२ जागा जिंकून बहुमत प्राप्त केले होते. काही दिवसापूर्वी एका ग्रा.पं. सदस्याचे सरपंचाशी मतभेद झाल्याने राजीनामा दिला होता. या जागेकरिता संचेरिया गटाचे अशोक बोरसरे व भाजपाचेच दीपक बावणकर यांनी नामांकन दाखल केले होते. दोन्ही गटाकरिता प्रतिष्ठेच्या असलेल्या या निवडणुकीत सरपंच गटाचा विजय झाला.
अशोक बोरसरे यांना ५५० तर दीपक बावणकर यांना ३०२ मते मिळाली. सोबतच नकारार्थी १३ मते पडली. संचेरिया गटाचे अशोक बोरसरे हे २४८ मतांनी निवडून आले. या निवडणुकीसाठी संचेरिया गटाचे उपसरपंच नितीन भावरकर, अल्का कोठे, नारायण बाकडे, किरण बोरकर, कुकडे, नौशाद शेख आदींनी प्रयत्न केले.
पवनूर येथे सत्ताधारी गटाला हादरा
आंजी (मोठी) : नजीकच्या पवनूर येथे सत्ताधारी गटाचे केशव कडू यांच्या निधनाने रिक्त जागेकरिता झालेल्या पोटनिवडणुकीकरिता रविवारी मतदान झाले. यात सत्ताधारी गटाला हादरा देत लक्ष्मण कोंडलकर विजयी झाले.
येथे सत्ता गटातर्फे सुभाष कडू यांनी नमांकन दाखल केले होते. यात लक्ष्मण कोंडलकर यांनी १९० मत घेत ३१ मतांनी सुभाष कडू यांना पराभूत केले. लक्ष्मण कोंडलकर महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अभियान सुरू झाले तेव्हापासून अध्यक्ष आहेत. तसेच ते आंजी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे सदस्य आहे. (वार्ताहर)