शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या सरासरीची माहिती इंटरनेटवर शोधा

By admin | Updated: November 25, 2014 23:00 IST

हवामानावर आधारित पीक विमा काढलेल्या शेतकऱ्याने या हंगामात किती पाऊस झाला, याबाबत कृषी विभागात विचारणा केली़ यावर सदर शेतकऱ्यास इंटरनेटवर शोधा, असे उत्तर देण्यात आले़

विरूळ (आ़) : हवामानावर आधारित पीक विमा काढलेल्या शेतकऱ्याने या हंगामात किती पाऊस झाला, याबाबत कृषी विभागात विचारणा केली़ यावर सदर शेतकऱ्यास इंटरनेटवर शोधा, असे उत्तर देण्यात आले़ या प्रकारामुळे शेतकरी अवाक झाला़ कृषी विभागाद्वारे शेतकऱ्यांना सहकार्य मिळत नसून योजनांची पूरेपूर माहिती दिली जात नसल्याचा आरोप सदर शेतकऱ्याने केला आहे़
शेतकऱ्याच्या पिकांना निसर्गाच्या लहरीपणामुळे फटका बसू नये, शेतमालाचे उत्पादन न झाल्यास किमान विम्याच्या माध्यमातून भरपाई तरी मिळावी म्हणून हवामान आधारित पीक विमा योजना राबविली जात आहे़ या योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे़ शासनस्तरावर योजनेत सहभाग वाढावा म्हणून मुदतवाढही दिली जात आहे; पण कृषी विभागातून योजनेशी संबंधित माहिती मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत़ याचा अनुभव धामणगाव (वाठोडा) येथील प्रवीण ठाकरे नामक शेतकऱ्याला आला आहे़ सदर शेतकऱ्याने जिल्ह्यात हवामान आधारित पीक विमा योजना सुरू होताच विम्याची रक्कम अदा करून सहभाग घेतला़ ठाकरे यांच्याकडे चार खाते धारकांची वायफड शिवारात एकूण २१ एकर जमीन आहे़ त्यांनी यावर्षी कापसाची पेरणी केली़ २१ एकरातील पिकाचा हवामान आधारित विमाही काढला़ यासाठी त्यांनी हप्त्याची १३ हजार ५०० रुपयांची रक्कमही अदा केली़ सदर पावतीही त्यांनी जपून ठेवली़
या हंगामात अनियमित पाऊस झाला़ कधी अतिवृष्टी तर कधी पावसाने दडी मारली़ यात शेतातील कपाशीच्या पिकाची वाट लागली़ यामुळे त्यांनी हवामान आधारित पीक विम्याचा लाभ मिळावा म्हणून हक्क सांगितला; पण यासाठी त्यांना कधी किती पाऊस झाला, अतिवृष्टी कधी झाली व पावसाने दडी कोणत्या काळात मारली, याची माहिती हवी होती़ यामुळे त्यांनी कृषी विभागाकडे सदर माहिती मागितली; पण जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने त्यांना पावसाची इंटरनेटवर माहिती शोधा, असे लेखी पत्रच देऊन टाकले़ या प्रकारामुळे ठाकरे यांना धक्काच बसला़ कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने पावसाच्या आकडेवारीची प्रत काढली; पण ती प्रत देऊ नका, असा आदेश असल्याचे सांगण्यात आले़ यामुळे शेतकऱ्याची गोची झाली़ या प्रकरणाची सखोल चौकशी करून पावसाच्या अनियमिततेबाबत माहिती मिळावी व पीक विम्याची रक्कम देण्यात यावी, अशी मागणी प्रवीण ठाकरे यांनी निवेदनातून केली आहे़(वार्ताहर)