शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
2
IPL 2026: बंगळुरूमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची जागा का बदलण्यात आली? अचानक असं काय घडलं?
3
बंगालमध्ये भाजपा जिंकली, पण फायदा काँग्रेसचा, अनेक वर्षांपासून तृणमूलच्या ताब्यात असलेलं कार्यालय झालं मुक्त
4
तामिळ इंडस्ट्रीमधील स्टार, लेखिका, दिग्दर्शिका म्हणून काम, कोण आहे विजयची आई?
5
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
6
पाकिस्तानी खेळाडूंना भारतात नो एन्ट्री, केवळ बहुपक्षीय स्पर्धांसाठीच परवानगी; भारत सरकारकडून भूमिका स्पष्ट
7
स्वामींच्या मठात काय करू नये? सगळी सेवा एका क्षणात शून्य होईल; ‘हे’ केल्यास पुण्यच लाभेल!
8
Akola Crime: आई-वडील कामावर जाताच राक्षसी कृत्य; चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या ६० वर्षाच्या व्यक्तींकडून अनेकवेळा अत्याचार
9
Top Marathi News LIVE: प. बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार थांबेना, आतापर्यंत चौघांचा मृत्यू
10
"भारतात स्फोट होतच असतात, यात नवीन काय?" पंजाबमधील स्फोटांवर फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान
11
यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार...
12
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
13
‘‘जॉनी जॉनी येस पापा’, सारख्या कविता मुलांना खोटं बोलायला शिकवतात’, उत्तर  प्रदेशच्या शिक्षणमंत्र्यांचा दावा  
14
Viral Video: सांगितली स्कूटर अन् दरात उभी केली बीएमडब्लू, लेकानं दिलेलं गिफ्ट पाहून आई- बाबा झाले शॉक!
15
Trisha Krishnan : महागड्या कार, आलिशान घरासह कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे अभिनेत्री तृषा कृष्णन
16
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
17
सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार 'पावसात वाहून गेला'; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य
18
Spiritual Rebirth: एकटे राहावेसे वाटणे, भावनांचा उद्रेक होणे ही असू शकतात आध्यात्मिक पुनर्जन्माची लक्षणं!
19
"नुसतं नावाला 'घरचं मैदान', पिच बनवताना आम्हाला विचारत नाहीत.."; DC च्या कोचचा राग अनावर
20
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील बँक शाखेचा विस्तार करा

By admin | Updated: August 5, 2015 02:09 IST

येथे एक राष्ट्रीयकृत बँकेची शाखा आहे. त्याला परिसरातील सर्व गावे जोडण्यात आली आहे.

ग्राहकांची होते ताटकळ : कार्यालयासमोर लागतात रांगा
खरांगणा (मो.) : येथे एक राष्ट्रीयकृत बँकेची शाखा आहे. त्याला परिसरातील सर्व गावे जोडण्यात आली आहे. त्यामुळे या बँकेच्या कार्यालयात ग्राहकांची मोठी गर्दी होऊन कोंडी पाहायला मिळते. सध्या शेतीचा हंगाम असल्याने शेतकऱ्याना पीक कर्जाकरिता येथे वारंवार यावे लागते. याशिवाय विविध योजनेतील लाभार्थी यांची संख्या अधिक असल्याने येथे बँक कार्यालयासमोर ग्राहकांच्या रांगा लागतात. ग्रामीण भागातील शाखेचा विस्तार करण्याची मागणी परिसरातील ग्राहकांनी केली आहे.
याचा सर्वाधिक फटका वृद्धांसह विद्यार्थ्यांना बसत सहन करावा लागत आहे. याप्रकाराने वेळ आणि श्रम याचा अपव्यय होत आहे. यामुळे ग्रामस्थांत संतापाचे वातावरण आहे. खरांगणा (मोरांगणा) हे गाव जवळपास दहा हजार लोकसंख्येचे आहे. येथील बँकेसोबत परिसरातील २५ ते ३० गावाचा संपर्क येतो. येथे बँक आॅफ इंडिया, एचडीएफसी या बँक शाखेसह को-आॅपरेटिव्ह बँकेचीसुद्धा शाखा होती. परंतु बँक डबघाईस आल्याने येथील शाखा बंद करण्यात आली. त्यामुळे आता केवळ एक राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेवर हजारो ग्राहकांचा ताण पडला आहे. त्यामुळे कामकाज प्रभावित होते.
विविध योजना बँकेच्या माध्यमातून जोडण्यात आल्या आहे. त्यामुळे ग्राहक संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. अधिकाधिक ग्राहक राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेशी जोडले आहेत. असे असले तरी ग्राहकांचा व्याप पाहता राष्ट्रीकृत बँक शाखांचा त्या प्रमाणात विस्तार झाला नाही. याबाबत संबंधित व्यवस्थापनाकडून कोणत्याही हालचाली होताना दिसत नसल्याने ग्राहकांची कोंडी होत आहे.
येथील बँक आॅफ इंडियाच्या शाखेत नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागते. शेतकरी, विद्यार्थी, सेवानिवृत्त कर्मचारी व शिक्षकांसह इतर शासनाच्या योजनांचा लाभ घेणारे लाभार्थी रांगेतच थांबतात. त्यातही वारंवार लिंक फेल होत असल्याने काम स्थगित होते. त्यामुळे ग्राहकआंची ताटकळ वाढते. ग्राहकांची होत असलेली गैरसोय आणी परिस्थिती लक्षात घेता येथे एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेची एक शाखा देण्यात यावी, आणि शाखेचा विस्तार करावा अशी मागणी आहे.(वार्ताहर)
लिंक फेल होत असल्याने व्यवहार होतात ठप्प
शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी बँकेत जावे लागते. या योजनांचा निधीसुद्धा बँकेमधून उपलब्ध करुन दिल्या जातो. त्यामुळे कामाचा व्याप वाढत आहे. याचा नाहक त्रास ग्राहकांना सहन करावा लागत आहे.
येथील बँकेत परिसरातून आलेले ग्राहक असतात. त्यांनाही काम होईपर्यंत येथे दिवसभर थांबावे लागते. बँकेची लिंक फेल झाल्यास अनेकदा आल्यापावली परतावे लागते. शेवटच्या टप्प्यापर्यंतही व्यवहार होत नसल्याने श्रम आणि पैसा याचा अपव्यय सहन करावा लागतो. यावर तोडगा काढणे गरजेचे ठरत आहे.