शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
2
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
3
Latest Marathi News LIVE: दाऊदचा 'खास' सलीम डोला याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
4
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
5
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
6
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
7
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
8
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
9
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
10
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
11
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
12
काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
13
नवी ७-सीटर इलेक्ट्रिक SUV Lexus 'TZ' लाँच; ५३० किमी रेंज, अवघ्या ३५ मिनिटांत होणार चार्ज! बघा फीचर्स
14
"आम्हाला काँग्रेसपासून वेगळं बसवा"; कनिमोझींचं थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र; तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप
15
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
16
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
17
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
18
Gold Silver Rate Today: सोनं २७०० रुपयांनी तर चांदी १०९०० रुपयांपेक्षा अधिकनं महागलं; पटापट चेक कर आजचा लेटेस्ट रेट
19
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
20
स्वप्न शास्त्र: श्रीमंत व्हायचंय? मग स्वप्नात दिसलेल्या 'या' गोष्टी कोणालाही सांगू नका 
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची अस्तित्वाची, तर भाजपच्या प्रतिष्ठेची लढाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 04:57 IST

जालना लोकसभा मतदार संघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागूल आहे.

- संजय देशमुख
जालना लोकसभा मतदार संघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागूल आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे सलग पाचव्यांदा या मतदार संघातून निवडणूक लढवत असून, यावेळीही विजयासाठी ते अथक प्रयत्न करताना दिसून येत आहे. पक्षबांधणी आणि केलेली विकास कामे या मुद्दयावर ते मत मागत आहेत.
काँग्रेसाठी ही निवडणूक अस्तित्वाचा प्रश्न बनली आहे. गेल्या सहा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला विजयश्री खेचून आणता आली नाही. दानवे हे २००९ चा अपवाद वगळता नेहमीच कुठल्याना कुठल्या लाटेवर निवडणुन आले आहेत. यंदा अशी कुठलीच लाट नसल्याने त्यांना मोठे परिश्रम घ्यावे लागत आहे. मध्यंतरी मित्रपक्षाचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी त्यांना निवडणुकीत आव्हान देण्याची गर्जना केली होती. त्यामुळे त्यांचे मन वळवितांना दानवेंची मोठी दमछाक झाली. यामध्ये थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच श्रीकृष्णाची भूमिका निभवावी लागली होती. मोठ्या प्रयत्नांती खोतकर यांचे बंड शमविण्यात यश आले.
हे जरी खरे असले तरी दानवे आणि खोतकरांच्या वादात शिवसैनिक भरडला गेला. नेमके कोणाचे ऐकावे असा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला होता. आता हा मुद्दा निकाली निघाल्यावर खोतकर आणि दानवे गळ्यात गळे घालून फिरत आहेत. मात्र, शिवसैनिक कुठली भूमिका घेतात ही देखील महत्वाची बाब ठरू शकते.


भाजपकडे कुशल संघटन कौशल्य असल्याने त्या जोरावर दानवे यांची स्थिती मजबूत असल्याचे बोलले जात आहे. परंतू, केंद्र आणि राज्यातील सरकारने शेतकरी विरोधी घेतलेली भूमिका तसेच राफेलचा मुद्दा आणि शहीद सैनिकांच्या नावावर मते मागण्यासाठीचा आटापिटा या बाबी न पटणाऱ्या आहेत.
त्यातच दानवे यांनी केलेले शेतकरी विरोधी वक्तव्यही नागरिक विसरलेले नाही तर दुसरीकडे काँग्रेसने स्वच्छ प्रतिमा असलेल्या सेवादलाचे राज्य अध्यक्ष विलास औताडे यांना मैदानात उतरविले आहे. यामुळे काँग्रेसमध्ये गटबाजी दिसत नाही. प्रत्येकजण औताडे यांना विजयी करण्यासाठी जिवाचे रान करत आहे. विकासकामे करताना दानवे यांनी त्यांच्या नातेवाईकांचे आर्थिक हित कसे जपले हा मुद्दा औताडेकडून प्रचारात उचलला जात आहे. वंचित आघाडीचे डॉ. शरदचंद्र वानखेडे किती मते खेचतात याकडे लक्ष लागून आहे.

>गेल्या पाच वर्षामध्ये केंद्र आणि राज्यात सत्ता असल्याने विविध विकास कामांना कोट्यावधी रूपयांचा निधी खेचून आणला. ड्रायपोर्ट, आयसीटी, जिल्ह्यातील रस्ते आदंीचा यात समावेश आहे. या निवडणुकीत आपण विकासाच्या मुद्दयावरून मत मागणार असून, जनता निश्चित साथ देईल
- रावसाहेब दानवे, भाजप
>विकासाच्या नावाखाली गेल्या पाच वर्षामध्ये केवळ धुळफेक करण्यात आली आहे. २० वर्षापासून भाजपचेच खासदार असताना पाहिजे तसा विकास झालेला नाही. एकूणच प्रस्तापितांविरूद्ध यावेळी वातावरण असल्याने त्या वातावरणाचा आपल्याला निश्चित फायदा होणार आहे.
- विलास औताडे, काँग्रेस
>कळीचे मुद्दे
काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे यांचा जिल्ह्यात असलेला कमी संपर्क महत्वाचा मुद्दा ठरू शकतो.
भाजप-शिवसेनेचे मनोमिलन झाले असले, तरी याचे पडसाद प्रत्यक्ष मतदानावर कसे पडतात हे २३ मे ला मतमोजणीनंतर कळणार आहे.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019jalna-pcजालना