शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
5
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
6
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
7
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
8
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
9
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
10
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
11
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
12
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
13
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
14
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
15
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
16
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

जिल्ह्यात ३,६५२ व्यक्तींना रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2020 5:00 AM

जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार विभागाकडे नोकरीसाठी जिल्ह्यातून २० हजारांवर युवकांनी नोंदणी केलेली आहे. त्यापैकी सात हजार १४६ युवकांनी कौशल्य विकासाच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतले आहे. यामध्ये सर्वाधिक प्राधान्य माहिती तंत्रज्ञान, उत्पादन व निर्मिती, बँकिंग व अकाउंटन्सिग, इलेक्ट्रीकल्स गारमेंट तयार करणे या प्रशिक्षणाला प्राधान्य दिलेले आहे.

ठळक मुद्देकौशल्य विकासातून ६५९ युवक वळले स्वयंरोजगाराकडे

चैतन्य जोशी ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तातडीने नोकरी मिळणे सध्यातरी दुरापास्त झाले आहे. त्यामुळे युवकांनी कौशल्य विकासाच्या माध्यमातून प्रशिक्षण घेऊन स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यावर भर दिला आहे. यामध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण झालेल्या युवकांनाही प्रशिक्षणाचा आधार आहे. माहिती तंत्रज्ञान, उत्पादन आणि निर्मिती, बँकिंग आणि अकाउटिंग, इलेक्ट्रिकल्स, फॅशन डिझायनिंग, गारमेंट तयार करणे याला प्राधान्य दिल्याचे दिसत आहे. यातून आजपर्यंत ३ हजार ६५२ जणांना नोकरी व रोजगाराची संधी मिळाली आहे. तर ६५९ युवकांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला आहे.जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार विभागाकडे नोकरीसाठी जिल्ह्यातून २० हजारांवर युवकांनी नोंदणी केलेली आहे. त्यापैकी सात हजार १४६ युवकांनी कौशल्य विकासाच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतले आहे. यामध्ये सर्वाधिक प्राधान्य माहिती तंत्रज्ञान, उत्पादन व निर्मिती, बँकिंग व अकाउंटन्सिग, इलेक्ट्रीकल्स गारमेंट तयार करणे या प्रशिक्षणाला प्राधान्य दिलेले आहे.यामध्ये काही अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेले युवक कौशल्य विकासाकडे वळले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता नोकरीच्या संधी वाढणार आहेत. स्थानिक युवकांना स्वत:च्या जिल्ह्यातच रोजगार हवा आहे. त्यामुळे हे युवक कौशल्य विकासाच्या माध्यमातून पुढे जात आहेत.पदवीधर झाल्यानंतर अनुभव नसल्याने किंवा एखाद्या उद्योगात नोकरी मिळविताना तेथील कौशल्य या युवकांना उपलब्ध नसते. त्यामुळे नोकरीची संधी गमवावी लागते. पण, कौशल्य विकासामुळे नोकरी तसेच व्यवसायाची संधी उपलब्ध होते. आतापर्यंत जिल्ह्यातील ७ हजार १४६ युवकांनी कौशल्य विकासाच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतले आहे. त्यापैकी ३ हजार ६५२ युवकांना नोकरीची संधी मिळाली आहे. या माध्यमातून नोकरी मिळण्याचे प्रमाण अधिक आहे.सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर युवकांना नोकरीची संधी उपलब्ध असली तरी संसर्गाचा धोका असल्यामुळे युवक बाहेरच्या तालुक्यात व जिल्ह्यात जाण्याचे टाळत आहेत. अशा युवकांना कौशल्य विकासाच्या माध्यमातून स्वयंरोजगार किंवा व्यवसाय सुरु करता येऊ शकतो. त्यामुळे युवकांनी संधीचे सोने केले पाहिजे.लॉकडाऊन काळात ८६ युवकांना रोजगारकोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील चार महिन्यांपासून लॉकडाऊन असल्याने अनेकजण बेरोजगार झाले असून युवकांच्या हाताला काम नाही. जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत १ हजार ७६२ युवकांनी नोंदणी केली असून ८६ युवकांना रोजगार मिळाला आहे. तर ३२ युवकांनी स्वयंरोजगार उभा केला आहे.महाजॉब पोर्टलवर नोंदणीचे आवाहनडीआयसीने महाजॉब पोर्टल सुरू केले असून युवकांनी महास्वयं पोर्टलसह महाजॉब पोर्टलवर सुशिक्षित बेरोजगारांनी नोंदणी करावी, तसेच जे एनजीओ, व्यक्ती प्रशिक्षण देण्यास इच्छुक असेल त्यांनी स्कील इंडिया पोर्टल (एनएसडीसी) या वेब पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल विकास विभाग कार्यालयाशी संपर्क करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. 

टॅग्स :Employeeकर्मचारी