शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

नाट्यसंकुलाचा प्रश्न लॉकडाऊन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 05:00 IST

नाट्यगृहाची वास्तू अर्धवट अवस्थेत पडून आहे. यानंतर उमरी (मेघे) तसेच जिल्हा उद्योग केंद्र परिसराची जागा निश्चित करण्यात आली होती. मात्र, अंतराची समस्या वाहनतळ व इतर दृष्टीने या जागा गैरसोयीच्या ठरत असल्याने त्यावर कलावंत आणि प्रशासनात एकमत होऊ शकले नाही.

ठळक मुद्देकलावंतांची उपेक्षा कायम : लोकप्रतिनिधींची मागणी रेटून धरण्याची होतेय मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा अ शहराला सांस्कृतिक, सामाजिक वारसा लाभलेला आहे. गांधीजिल्हा म्हणून जगभरात ओळख असलेल्या वर्ध्याच्या या मातीत अनेक कलावंत घडले. मात्र, शहरात नाट्यगृहाची कमतरता कायमच आहे. काही वर्षांपूर्वी नाट्यगृहाकरिता ठाकरे मार्केटमधील प्रांगण निश्चित करण्यात आले होते. बांधकाम सुरू झाले आणि कालांतराने रखडले. यावर झालेला कोट्यवधींचा खर्चही पाण्यात गेला. आजही नाट्यगृहाची वास्तू अर्धवट अवस्थेत पडून आहे. यानंतर उमरी (मेघे) तसेच जिल्हा उद्योग केंद्र परिसराची जागा निश्चित करण्यात आली होती. मात्र, अंतराची समस्या वाहनतळ व इतर दृष्टीने या जागा गैरसोयीच्या ठरत असल्याने त्यावर कलावंत आणि प्रशासनात एकमत होऊ शकले नाही. सांस्कृतिक भवन संकुल निर्माण समितीने विविध आंदोलनांच्या माध्यमातून शासन-प्रशासनाचे लक्ष वेधले. जनरेट्यानंतर अखेर प्रलंबित हा विषय मार्गी लागला. नाट्यगृहासाठी तत्कालीन शासनाने हिरवी झेंडी दिली. तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुुनगंटीवार यांनी विशेष बाब म्हणून २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.वर्धा बसस्थानकालगतच्या जिल्हा परिषदेच्या महात्मा गांधी विद्यालयाची जागा नाट्यगृहाकरिता निश्चित करण्यात आली. जिल्हा प्रशासनाने याला मान्यता प्रदान केली. मात्र, प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही. नाट्यगृहाचे भूमिपूजन होण्यापूर्वीच शासकीय यंत्रणेकडून पुन्हा सुधारित अंदाजपत्रकासह २८ कोटींचा प्रस्ताव आणि आराखडा शासन मान्यतेकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव यांंना सादर करण्यात आला.वास्तविक नाट्यगृहासाठी सांस्कृतिक भवन, संकुल निर्माण समितीची वाढीव निधीची मागणी नव्हती.पूर्वी मंजूर झालेला २५ कोटींचा निधी पुरेसा होता. मात्र, शासकीय यंत्रणेने नेहमीप्रमाणे घोळ घातला. याला मान्यता मिळण्यापूर्वीच विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यात. आदर्श आचारसंहिता लागू झाली आणि नाट्यगृहाचा विषय परत लांबणीवर पडला. पाच वर्षांच्या कालावधीत नाट्यगृहाच्या बांधकामात असे अनेक अडथळे निर्माण झालेत आणि नाट्यसंकुलाचा विषय रेंगाळतच राहिला. राज्यात सत्तापरिवर्तन होत महाविकास आघाडीचे सरकार सत्तारुढ झाले. आता कोरोना विषाणूने थैमान घातले. लॉकडाऊनमुळे सर्व काही ठप्प झाले. पर्यायाने नाट्यसंकुलाचा प्रश्नही लॉकडाऊनच झाला आहे.

 

टॅग्स :Socialसामाजिक