शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

जिल्ह्यात वाहनांना संचारबंदी; प्रदूषण ‘लॉकडाऊन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2020 5:00 AM

मुख्यमंत्र्यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी जाहीर केल्यानंतर सर्व वाहनांची चाके जागेवरच थांबली आहेत. जिल्ह्यात प्रत्येक व्यक्तीमागे १ वाहन आहे. यात दुचाकी वाहनांची संख्या मोठी आहे. या व सर्वच प्रकारच्या वाहनांमधून मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साईड हवेत मिसळतो.

ठळक मुद्देध्वनी, वायूप्रदूषण घटले : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे रस्तेही घेताहेत मोकळा श्वास

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी अगोदर जमावबंदी व आता १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनचा अंमल करण्यात आला आहे. यामुळे सर्व प्रकारची सार्वजनिक आणि खासगी वाहतूक बंद करण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही ठप्प आहे. परिणामी, रस्त्यांवर प्रचंड शुकशुकाट असून एखाद-दोन वाहनेच दृष्टीस पडत आहेत. यामुळे जिल्ह्यातील वायूप्रदूषणाची पातळी झपाट्याने कमी झाली आहे. कोरोनामुळे सर्व नागरिक घरातच असल्याने कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी मदत होत असताना दुसरीकडे काही दिवसांकरिता तरी प्रदूषण कमी झाल्याचे चित्र आहे.जिल्ह्याची लोकसंख्या १२ लाखांवर आहे. तर नोंदणीकृत वाहनांची संख्या ३ लाख ८ हजार ९६० आहे. याशिवाय सार्वजनिक वाहनांची संख्या वेगळी आहे.मुख्यमंत्र्यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी जाहीर केल्यानंतर सर्व वाहनांची चाके जागेवरच थांबली आहेत. जिल्ह्यात प्रत्येक व्यक्तीमागे १ वाहन आहे. यात दुचाकी वाहनांची संख्या मोठी आहे. या व सर्वच प्रकारच्या वाहनांमधून मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साईड हवेत मिसळतो.तो आता थांबला आहे. त्यामुळे शुद्ध हवेत काही काळ वावरता येणार आहे. कार्बन डायऑक्साईड, सल्फर डाय आॅक्साईड या घातक वायूंचे प्रमाण कमी झाल्याने वातावरण स्वच्छ झाले असून हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण वाढले आहे.वाहनेच रस्त्यांवरून धावत नसल्याने ध्वनिप्रदूषणालाही आळा बसला आहे. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. वाहनांमुळे होणारे किरकोळ अपघात आणि वादावादीही बंद झाल्याचे चित्र सध्या शहरातच नाही जिल्ह्याभरात पहावयास मिळत आहे.दुचाकी वाहनांची संख्या अडीच लाखांवरजिल्ह्यात ३ लाख ८ हजार ९६० नोंदणीकृत सर्व प्रकारची वाहने आहेत. यात मोटर, कार व इतर चारचाकी वाहने २० हजार ८२०, दुचाकींची संख्या २ लाख ५५ हजार १७७ इतकी आहे. ही सर्व वाहने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जागीच थांबली असल्याने ध्वनी आणि वायूप्रदूषणात बंदच्या काळापासून घट झाल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात प्रत्येक कुटुंबात किमान चार दुचाकी वाहने आहेत. गुढीपाडवा आणि सणोत्सवात वाहनांची मोठ्या प्रमाणावर खरेदी आणि नोंदणी होते. यावेळी गुढीपाडवा सणावरही कोरोनाचे सावट होते. परिणामी नवीन दुचाकी, चारचाकी वाहनांची नोंदणी झाली नाही. संचारबंदीमुळे मागील ११ दिवसांपासून वाहतूक ठप्प आहे. यामुळे प्रदूषणात साहजिकच घट झाली आहे. ही पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय चांगली बाब म्हणावी.-विजय तिराणकरसहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वर्धा

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसpollutionप्रदूषण