शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
4
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
5
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
6
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
7
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
8
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
9
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
10
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
11
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
12
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
13
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
14
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
15
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
16
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
17
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
18
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
19
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील कृउबास बरखास्त करा

By admin | Updated: August 27, 2015 02:24 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून संचालकांची निवड होते; पण शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मतदान करता येत नाही.

वर्धा : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून संचालकांची निवड होते; पण शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मतदान करता येत नाही. यामुळे बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांचे प्रतिनिधीच नाहीत, हे वास्तव आहे. यात बदल करण्यासाठी कायद्यात सुधारणा करावी व बाजार समित्या बरखास्त कराव्या, अशी मागणी म. फुले समता परिषदेने केली. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी नावडकर यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.गत ४८ वर्षांपासून कृषी उत्पन्न बाजार समित्या व राजकीय पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या नावावर मलिदा लाटला; पण बाजार समित्यांच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मतदानातून संचालक निवडून देण्याचा अधिकार दिला नाही. प्रचलित कायद्याप्रमाणे बाजार समितीत शेतकऱ्यांचे १५ संचालक आहे; पण त्यांची निवड बाजार समित्यांतील शेतकरी प्रत्यक्ष करीत नाही. त्या परिसरातील कृषी सहकारी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्थांचे कार्यकारिणी सदस्य, ग्रा.पं. सदस्य मतदानाने करतात. शिवाय अडते व दलालांचे दोन तर मापारी हमाल यांचे संचालक प्रत्यक्ष अडते, दलाल व हमालांच्या प्रत्यक्ष मतदानातून निवडले जातात. शेतकऱ्यांच्या नावावर निर्माण झालेल्या या बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांनाच प्रत्यक्ष मतदान करून संचालक निवडण्याचा अधिकार नाही. कृषी सहकारी पतसंस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्था वा ग्रा.पं. सदस्य हे कायद्याने संपूर्ण शेतकऱ्यांचे प्रतिनिधी होऊ शकत नाही. त्यांनी निवडून दिलेली बाजार समिती ही शेतकऱ्यांची समिती आहे व ती शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करते, हे सांगणे म्हणजे शेतकरी, कायदा व लोकशाहीची थट्टा करणे होय. यामुळे शेतकरी विरोधी कायद्याने स्थापन सर्व बाजार समित्या बरखास्त कराव्या. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे संचालक निवडण्याचा अधिकार देण्यासाठी कायद्याच्या कलम १३ मध्ये तशी दुरूस्ती करावी, अशी मागणी महात्मा फुले समता परिषदेने केली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांच्यामार्फत निवेदन सादर करण्यात आले आहे. यावेळी विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे, संघटक विनय डहाके व पदाधिकारी उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)