शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दीप पर्वासाठी सज्ज मिष्टान्न ‘अनहेल्दी’?

By admin | Updated: October 22, 2014 23:21 IST

हिंदू संस्कृतीतील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण म्हणून दिवाळीचा उल्लेख केला जातो़ गरीब-श्रीमंत सर्वच हा दीपोत्सव साजरा करण्यासाठी खटाटोप करीत असतो़ दिवाळी म्हटली की, विविध पक्वान्नाचा

प्रशांत हेलोंडे - वर्धाहिंदू संस्कृतीतील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण म्हणून दिवाळीचा उल्लेख केला जातो़ गरीब-श्रीमंत सर्वच हा दीपोत्सव साजरा करण्यासाठी खटाटोप करीत असतो़ दिवाळी म्हटली की, विविध पक्वान्नाचा आस्वाद आलाच! अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ दिवाळी सणासाठी तयार केले जातात़ बाजारपेठाही मिष्टान्नांनी सजलेल्या दिसतात़ सणोत्सवात कुणाच्या आरोग्याला अपाय होऊ नये म्हणून बाजारातील खाद्यपदार्थांची तपासणी अनिवार्य केली आहे; पण जिल्ह्यात यंदा बाजारातील खाद्य पदार्थ व मिष्टान्न तयार करण्यासाठी लागणाऱ्या मालाची तपासणीच झाली नसल्याचे समोर आले आहे़दिवाळी सणाची चाहुल लागताच मिठाईच्या बाजारातील हालचालींना वेग येतो़ महिनाभरापूर्वीपासून कच्चा माल बुक करणे, जिल्ह्यात वा परिसरातील ग्रामीण भागातून दूध आणि दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध होत नसल्यास दुसऱ्या राज्यातून दूध, खवा, पनीर, मैदा आदी पदार्थ मागविणे सुरू होते़ हा माल पोहोचण्यासही बराच कालावधी लागतो़ यामुळे आधीच आॅर्डर दिली जाते़ मोठ्या प्रमाणात कच्च्या मालाची मागणी राहत असल्याने याच काळात भेसळीच्या प्रमाणातही वाढ होते़ सर्वच पदार्थांमध्ये सर्रास भेसळ केली जाते़ यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते़ अन्नपदार्थांमध्ये होणारी ही भेसळ नागरिकांच्या जीविताला धोकादायक ठरते़ हा प्रकार लक्षात घेऊनच शासनाने सणोत्सवामध्ये बाजारात उपलब्ध होणारे मिष्टान्न, संबंधित कच्चा माल यांची तपासणी करावी, भेसळयुक्त माल आढळल्यास तो जप्त करावा, असे कडक निर्देश अन्न व औषधी प्रशासन विभागाला दिले आहेत़ यामुळेच अन्न व औषधी प्रशासन विभागाद्वारे दिवाळीपूर्वी तपासणी मोहीम हाती घेतली जाते़ भेसळयुक्त पदार्थांपासून तयार मिष्टान्नातून विषबाधा होऊ नये म्हणून बाजारातील उपहारगृह, हॉटेल, स्वीटमार्ट आदींची तपासणी केली जाते़ यात दूध, खवा, पनीर, मैदा यासह अन्य दुग्धजन्य पदार्थांची तपासणी केली जाते़ भेसळ केलेले पदार्थ आढळून आल्यास ते जप्त केले जातात़ शिवाय मिष्टान्न तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचीही तपासणी केली जाते़ दिवाळीपूर्वी संपूर्ण राज्यात ही मोहीम राबविली जाते; मात्र वर्धा जिल्ह्यात यंदा ही मोहीम राबविण्यात आली नसल्याचे सांगितले जात आहे़ यामुळे शहरासह जिल्ह्यातील अन्य भागात मिळणारे मिष्टान्न नागरिकांच्या आरोग्यास योग्य असतील काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे़ एकवेळ शहरातील उपहारगृह, स्वीटमार्ट तपासण्यात आले असतील; पण जिल्ह्यातील अन्य ग्रामीण भागातील दुकानांची तपासणी झाली काय, हा प्रश्नच आहे़ ग्रामीण भागात मिष्टान्नामध्ये सर्रास भेसळ केली जाते़ मोठ्या प्रमाणात पदार्थ तयार केले जात असल्याने त्यांचा दर्जाही सूमार असतो़ यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे़ जिल्ह्यात लगतच्या राज्यातून मोठ्या प्रमाणात खवा आयात केला जातो़ या खव्याची तपासणी होते काय, हा प्रश्न अनुत्तरीत आहे़ या खव्यामध्ये विविध पदार्थांची भेसळ केली जात असल्याचे विके्रतेच नाव न सांगण्याच्या अटीवर सांगतात़ याबाबत माहितीसाठी अन्न व औषधी प्रशासनाचे मनोज तिवारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा भ्रमणध्वनी उत्तर देत नव्हता़