शहरं
Join us  
Trending Stories
1
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
2
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
3
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
4
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
5
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
6
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
7
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
8
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
9
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
10
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
11
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
12
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
13
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
15
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
16
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
17
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
18
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
19
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले

यशोदा नदीवरील पूल खचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2019 6:00 AM

गुरूवारी सायंकाळी एकाएक नदीच्या पुलाची एक बाजू खचली. ही घटना नांदोराकडून देवळीकडे जाणाऱ्या एका नागरिकाच्या लक्षात आली. त्याने घटनेची माहिती इतरांना दिल्यानंतर पोलिसानाही माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मार्ग वाहतुकीसाठी बंद असल्याचा फलक लावला.

ठळक मुद्देदेवळी-नांदोरा मार्ग बंद : पोलिसांनी धोका टाळण्यासाठी लावले कठडे

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : सततच्या पावसामुळे यशोदा नदीवरील पूल खचला. त्यामुळे देवळी-नांदोरा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. गुरूवारी सायंकाळी हा प्रकार उघडकीस येताच सतर्कतेचा एक भाग म्हणून देवळी पोलिसांनी या मार्गाच्या दोन्ही बाजूंनी लोखंडी कठडे लावून मार्ग वाहतुकीसाठी बंद असल्याचा सूचना फलक लावला आहे.गुरूवारी सायंकाळी एकाएक नदीच्या पुलाची एक बाजू खचली. ही घटना नांदोराकडून देवळीकडे जाणाऱ्या एका नागरिकाच्या लक्षात आली. त्याने घटनेची माहिती इतरांना दिल्यानंतर पोलिसानाही माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मार्ग वाहतुकीसाठी बंद असल्याचा फलक लावला. हा पूल अनेक वर्षांपासून दुर्लक्षीत असून नादुरूस्त आहे. पुलाच्या कडाही तुटल्या आहेत. शिवाय पुलावर ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहे.सदर बाब बांधकाम विभागाच्या लक्षात आणून दिल्यावरही त्याकडे दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानली जात आहे. प्रशासनाचे नियोजन नसल्याने पुलाचे जुने बांधकाम दुर्लक्षित ठरले आहे. तालुक्यातील इतर ठिकाणी सुद्धा काही प्रमाणात अशीच परिस्थिती आहे. डिगडोह नदीवरील पुलाचे एक बाजू पूर्णत: खरडून गेली आहे. त्यामुळे या पुलावरील वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे.नाल्यावरील रपट्याला काही ठिकाणी भेगा पडल्या आहे. त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेऊन वेळीच उपाययोजना करावी, अशी मागणी आहे.बोरी मार्गावरील पूल खचलाबोरधरण - बोरी येथील गावाजवळील पूल पुरामुळे खचला. अर्धाअधिक पूल खचल्याने या मार्गाने चार चाकी वाहन जाणे कठीण झाले आहे. शिवाय दुचाकी चालकांना जीव मुठीत घेऊनच पूल पार करावा लागत आहे. या मार्गावरील प्रवास एखाद्याच्या जीवावर बेतल्यावर दुरूस्तीचे काम हाती घेणार काय, असा प्रश्न या भागातील नागरिकांकडून विचारला जात आहे.चार दिवसांपासून पुलावरील पाणी कमी होईनाआंजी (मोठी) - येथून ४ किमी अंतरावर असलेल्या खैरी येथील ग्रामस्थांच्या अडचणीत सध्या चांगलीच भर पडली आहे. पुलावरून पाणी वाहत असल्याने मागील चार दिवसांपासून या गावाचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे. विशेष म्हणजे कुठलेही साहित्य खरेदी करण्यासाठी या गावातील नागरिकांना आंजी (मोठी) येथे यावे लागते.सेलू तालुक्याच्या शेवटच्या टोकावर ६०० लोकसंख्या असणारे खैरी हे गाव आहे. या गावाचा प्रत्येक कामासाठी आंजी (मोठी) या गावाशी संपर्क पडतो. वर्धा-आर्वी मार्गावरून या गावात जाण्यासाठी जोड रस्त्यावर धाम नदी वरून पूल आहे. परंतु, तो छोटा असल्याने आणि त्याची उंचीही कमी असल्याने पावसाळ्यात या गावातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो.मागील चार दिवसांपासून याच पुलावरून सतत पुराचे पाणी वाहत आहे. शिवाय वाहणाºया पाण्याला चांगलाच प्रवाह असल्याने या पुलावरून ये-जा करणे कठीण झाले आहे. काही जण जीव मुठीत घेऊन हा पूल ओलांडण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे हा प्रकार एखाद्या अनुचित घटनेला निमंत्रण देणारा ठरत आहे. पुलाची उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी गत २० वर्षांपासून होत असून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. दहा वर्षांपूर्वी या गावातील नागरिकांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता, हे विशेष.

टॅग्स :Policeपोलिसroad transportरस्ते वाहतूक