शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

मुख्याध्यापकाचे पद वाचविण्यासाठी दाखविले बोगस विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 6:00 AM

शहरालगतच्या सावंगी (मेघे) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सातवीपर्यंत वर्ग आहेत. या शाळेच्या मुख्याध्यापिका मृणालीनी पखाले यांनी २०१८-१९ च्या शैक्षणिक सत्रामध्ये स्वत: चे व एका सहाय्यक शिक्षकाचे पद वाचविण्यासाठी ३० सप्टेंबर २०१८ च्या संच मान्यतेकरिता तब्बल ४१ बोगस विद्यार्थ्यांची दाखलखारीजवर नोंद केली.

ठळक मुद्देकारवाई शून्य : सावंगी (मेघे) च्या जि.प. उच्च प्राथमिक शाळेतील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दरवर्षी ३० सप्टेंबरपर्यंतच्या संच मान्यतेनुसार शाळांना शिक्षकांची पदे मंजूर केली जाते. त्यामुळे शाळेतील अतिरिक्त ठरणाऱ्या सहायक शिक्षकासह मुख्याध्यापकाचे पद वाचविण्यासाठी तब्बल ४१ विद्यार्थी बोगस दाखविले. त्यामुळे पटसंख्या नसतानाही हे दोन्ही पदे कार्यरत असल्याचा धक्कादायक प्रकार सावंगी (मेघे) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत सुरु घडल्याचे उघडकीस आले आहे. मात्र, याकडे शिक्षण विभागाचा कानाडोळा होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.शहरालगतच्या सावंगी (मेघे) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सातवीपर्यंत वर्ग आहेत. या शाळेच्या मुख्याध्यापिका मृणालीनी पखाले यांनी २०१८-१९ च्या शैक्षणिक सत्रामध्ये स्वत: चे व एका सहाय्यक शिक्षकाचे पद वाचविण्यासाठी ३० सप्टेंबर २०१८ च्या संच मान्यतेकरिता तब्बल ४१ बोगस विद्यार्थ्यांची दाखलखारीजवर नोंद केली. त्यामुळे ३० सप्टेंबर २०१८ च्या संच मान्यतेत या शाळेतील पटसंख्या १४५ वर पोहोचली.या पटसंख्येनुसार शाळेतील कोणतेही शिक्षक अतिरिक्त ठरले नाही. मात्र संचमान्यतेनंतर लगेचच या ४१ विद्यार्थ्यांना दाखले देऊन कमीही करण्यात आले. पण, यासंदर्भात शिक्षण विभागाला कोणतीही माहिती दिली नाही. या बोगस विद्यार्थ्यांना दाखले दिल्यानंतर शाळेती पटसंख्या केवळ १०४ वर आली आहे. याच बनावट विद्यार्थ्यांच्या आधारे मुख्याध्यापक व सहायक शिक्षक नियमानुसार अतिरिक्त असतानाही वर्षभरापासून शासनाचे वेतन घेत आहे. याची माहिती पंचायत समिती शिक्षण विभागाला असूनही शिक्षण विभागाने डोळे मिटल्यामुळे कुठे तरी पाणी मुरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या गंभीर प्रकाराकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. याबाबत माहिती जाणून घेण्याकरिता पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी धनराज तायडे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.वर्षिक तपासणीत झाला होता खुलासासावंगी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेची पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष खिराळे यांनी ३ एप्रिल २०१८ रोजी वार्षिक तपासणी केली होती. यावेळी त्यांनी वर्ग १ ते वर्ग ७ पर्यंत सर्व वर्गाची तपासणी केली असता या शाळेतील उपस्थित पटसंख्या आणि शिक्षकांची मंजुरपदे याबाबत तफावत दिसून आली होती. इतकेच नाही तर संचमान्यतेपूर्वी वाढविलेले ४१ विद्यार्थी नंतर कमी झाल्याचे दिसून आले. पण, ते विद्यार्थी कोणत्या शाळेत गेले याची माहिती मुख्याध्यापकांना व शिक्षकांना नव्हती. असेही त्यावेळी तयार केलेल्या अहवालात नमुद करण्यात आले होते. मात्र, वर्ष लोटूनही शिक्षण विभागाकडून कारवाई केली गेली नाही. यामुळे याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Schoolशाळाfraudधोकेबाजी