शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
2
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
3
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
4
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
5
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
6
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
7
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
8
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
9
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
10
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
11
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
12
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
13
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
15
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
16
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
17
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
18
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
19
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
20
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
Daily Top 2Weekly Top 5

भाजपची आष्टीत बल्लेबल्ले तर सेलूत भोपळा

By admin | Updated: August 4, 2015 01:48 IST

आष्टी (शहीद) व सिंदी (रेल्वे) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सदस्यांकरिता रविवारी झालेल्या मतदानची सोमवारी मोजणी

वर्धा : आष्टी (शहीद) व सिंदी (रेल्वे) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सदस्यांकरिता रविवारी झालेल्या मतदानची सोमवारी मोजणी झाली. यात आष्टी येथे सत्ताबदल करीत भाजपाने झेंडा रोवला आहे. सिंदीत मात्र त्यांना भोपळाही फोडता आला नाही. येथे एकत्र आलेल्या त्रिकुटाने स्थापन केलेल्या एकता शेतकरी विकास आघाडीने सत्ता स्थापन केली. आष्टीतील सत्ता व सेलूतील पारंपरिक विरोधकांचे झालेले मनोमिलन नव्या राजकीय समीकरणांची नांदी ठरणार असल्याची चर्चा आहे.
आष्टी बाजार समितीत १८ जागांपैकी १५ जागांवर भाजपने ताबा मिळविला. तर काँग्रेसला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले. आर्वी बाजार समिती हातून गेल्याने भाजपाचे माजी आमदार दादाराव केचे यांनी आष्टीत सत्ता मिळविण्याकरिता विशेष परिश्रम घेतल्याची तर काँग्रेसला आमदार अमर काळे यांचा फाजिल आत्मविश्वास नडल्याची चर्चा आहे. त्यांनी निवडणुकीच्या काळात एका विशिष्ट समाजाला डावलल्याने ही अवस्था झाल्याचे बोलेल जात आहे. यामुळे गत काही काळांपासून असलेली काँग्रेसची सत्ता संपुष्टात आली.
सिंदी (रेल्वे) येथील निवडणुकीत काँगे्रसच्या गटाने एकता शेतकरी विकास आघाडी निर्माण करून निवडणूक लढविली. यात जिल्ह्याचे सहकार नेते माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख, जि.प.चे माजी अध्यक्ष विजय जयस्वाल, माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे एकत्र आले होते. या तिनही पारंपरिक विरोधकांच्या मनोमिलनामुळे या बाजार समितीतील सर्वच जागांवर त्यांनी एकतर्फी विजय मिळवित समितीवर ताबा कायम केला. बाजार समितीच्या निवडणुकीत प्रथमच विरोधात आलेल्या भाजपा आघाडीला एकही जागा मिळविता आली नाही. या बाजार समितीवर आपली सत्ता असावी याकरिता आ. पंकज भोयर व येळाकेळी सर्कलचे जि.प. सदस्य राणा रणनवरे यांनी धुरा सांभाळली होती. मात्र त्यांना एकही जागा मिळविता आली नाही.

सेलूत पत्रकार व शेतकरी संघाची भूमिका निर्णायक
४या निवडणुकीत पहिल्यांदाच उमेदवार उभ्या करणाऱ्या पत्रकार व शेतकरी संघाची भूमिका निर्णायक ठरली. त्यांच्यावतीने उभ्या करण्यात आलेल्या उमेदवारांनी घेतलेली मते ही भाजपच्या उमेदवारांची असल्याची चर्चा जोरात होती. या संघाने जर उमेदवार उभे केले नसते तर भाजपला काही जागांवर ताबा मिळविता आला असता, अशी चर्चा आहे.
४जिल्ह्यात भाजपाचे वाढलेले वर्चस्व रोखण्यासाठी या निवडणुकीत परंपरागत प्रतिस्पर्धी असलेल्या राष्ट्रवादी व काँग्रेसच्या गटाने आघाडी करून ही निवडणूक लढविली. यात त्यांना यश आल्याने झालेले मनोमिलन येत्या सर्वच निवडणुकीत पहावयास मिळेल, अशी चर्चा निकालानंतर सिंदी समितीच्या परिसरात होती.