शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय योजनांचा लाभ कागदावरच

By admin | Updated: August 20, 2014 23:42 IST

सर्वसामान्य वंचिताचे जीवनमान उंचावून त्यांनाही इतरांसारखे जगता यावे तसेच, वृद्ध निराधार, विधवा आणि दारिद्र्य रेषेखालील नागरिकांचाही उदारनिर्वाह व्हावा या उदात्त हेतूने शासनाकडून अनेक

लाभार्थ्यांची फरफट : खरे लाभार्थी आर्थिक मदतीपासून वंचित विरूळ (आ.) : सर्वसामान्य वंचिताचे जीवनमान उंचावून त्यांनाही इतरांसारखे जगता यावे तसेच, वृद्ध निराधार, विधवा आणि दारिद्र्य रेषेखालील नागरिकांचाही उदारनिर्वाह व्हावा या उदात्त हेतूने शासनाकडून अनेक योजना सुरू करण्यात आल्या. परंतु शासकीय विभागातील अनेक जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे या योजनांचा लाभ गरजू व खऱ्या लाभार्थ्यापर्यंत पोहचत नसल्यामुळे या योजना कागदोपत्रीच दिसून येते. गोरगरीब जनतेच जीवनमान उंचवावे यासाठी शासनाच्या विविध योजना आहे. पण बहुतांश योजनांचा फायदा ग्रामीण भागातील गरीब नागरिकांना मिळतच नाही. हच प्रकार आर्वीच्या तहसील कार्यालयामध्ये होत असल्याची ओरड होत आहे. ग्रामीण भागातील असंख्य निराधारांसाठी राबवित असलेल्या योजनांची माहितीच मिळत नसल्याचे वास्तव आहे. माहिती घेण्यासाठी संबंधित तहसील अथवा इतर कार्यालयामध्ये गेल्यास तिथे माहिती देण्यास संबंधितांकडून टाळाटाळ केली जात आहे. योजना कोणती आहे कोणासाठी आहे, त्यासाठी कोणती कागदपत्रे हवी, ती कुणाकडे सादर करावी असे अनेक प्रश्न गरजूंसमोर उभे राहतात. परंतु याबाबत योग्य माहिती देणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या आर्वी तहसीलमध्ये कमी पाहायला मिळत असल्याची ओरड नागरिक करीत आहे. रेशनकार्डच्या खिडकीवर नेहमीच गर्दी असते. चहा व पानटपरीत तासनतास कार्यालयीन वेळेत गप्पा मारणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना वृद्ध निराधार लाभार्थ्यांसाठी वेळ नसतो. शासनाने म्हणायला सेतू केंद्र उघडले. परंतु या सेतू केंद्राचा कारभार वेगवेगळ्या पद्धतीने चालतो. तासनतास रांगेत उभे राहून काम होईलच याची खात्री नसते. शासनाच्या अनेक योजना आहेत. परंतु अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे या योजनेची पूर्तता योग्यरित्या होत नाही. वृद्धापकाळ निवृत्ती योजना, आम आदमी विमा योजना, शौचालयासाठी मिळणारे अनुदान, कन्यारत्न योजना, अपंगाच्या सवलती, एका मुलीवर कुटूंब नियोजन योजना, एवढेच नव्हे तर शासनाने नव्यानेच सुरू केलेली अन्नसुरक्षा योजना या व इतर अनेक योजना सर्वसामान्य गरजू लाभार्थ्यापर्यंत पोहचल्याच नाही. शासकीय नियमानुसार या योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचविणे आवश्यक असते परंतु या योजनांची योग्य माहिती मिळत नसल्यामुळे अनेक गरीब गरजू लाभार्थी या चांगल्या योजनेपासून अजूनही वंचित आहे. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपिटीची मदत शासनाने महसूल विभागाला पाठविली आहे. परंतु अद्यापही अनेक शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही.(वार्ताहर)