शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
2
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
3
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
4
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
5
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
6
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
7
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
8
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
9
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
10
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
11
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
12
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
13
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
15
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
16
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
17
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
18
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
19
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
20
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
Daily Top 2Weekly Top 5

भूखंडाअभावी लाभार्थी घरकुलापासून वंचित

By admin | Updated: May 28, 2016 02:12 IST

शासनाच्या इंदिरा आवास योजनेंतर्गत घोराड येथील १८ व्यक्तींना घरकूल मंजूर करण्यात आले. मात्र त्यांचेजवळ स्वमालकीचे भूखंड नसल्याने...

३० वर्षांपासून वास्तव्य : शासनाचे वेधले लक्ष
घोराड : शासनाच्या इंदिरा आवास योजनेंतर्गत घोराड येथील १८ व्यक्तींना घरकूल मंजूर करण्यात आले. मात्र त्यांचेजवळ स्वमालकीचे भूखंड नसल्याने त्यांच्यावर या योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
येथील गावठाणावर बेघरांची मोठ्या प्रमाणात वस्ती आहे. गत ३० वर्षापासून ते येथे वास्तव्यास आहे. या ठिकाणी ग्रामपंचायतने रस्ते, नाल्या, पथदिवे, नळयोजना अशा सुविधा पुरविल्या आहे. मात्र त्यांना पक्के घर नाही. इंदिरा आवास योजनेत घरे मंजूर केली. मात्र स्वमालकीचा भूखंड असणे अनिवार्य असल्याने हे लाभार्थी वंचित राहिले. ग्रामपंचायतने ठराव घेऊन या १८ व्यक्तींना घरकुलाच्या लाभासाठी शासकीय भूखंड देण्याची मागणी केली आहे.
या मागणीचे पत्र उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले. यानंतर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने यादीत नावे असलेल्या लाभार्थ्यांनी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना निवेदन सादर केले. घरकुलापासून वंचित ठेवू नये, ज्या जागेवर आम्ही राहतो ती जागा भूखंड म्हणून मिळावी, अशी मागणी केली.
जिल्हा परिषदने २७ फेबु्रवारी २०१५ मध्ये घेतलेल्या सर्वसाधारण सभेत जिल्ह्यातील आनेक ग्रा.पं.मध्ये शासकीय जागा उपलब्ध केली आहे. त्यामधुन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन द्यावी, असा ठराव मंजूर केला. तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक यांनी या ठरावाच्या पाठपुराव्याकरिता तसे पत्र संबंधितांना पाठविले. या पत्राची प्रत निवेदनासह जोडण्यात आली.
शासन यावर कोणती कार्यवाही करेल याकडे लाभार्थ्यांचे लक्ष लागले आहे. निवेदन देताना ग्रा.पं. सदस्य ईश्वर धुर्वे, महेंद्र माहुरे, राजू उईके, राजू पंधराम उपस्थित होते.
(वार्ताहर)