शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

भरपावसाळ्यात शहरालगतच्या भागात कृत्रिम पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 5:00 AM

शहरालगतच्या अकरा गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा होतो. मात्र, पाणीपुरवठ्याकरिता पीव्हीसी जलवाहिनी टाकण्यात आल्याने अनेकवेळा जलवाहिनीला गळती लागते. परिणामी, पाणीपुरवठा ठप्प होतो. दर्जाहीन जलवाहिनीमुळे काही भागात अतिदाबाने तर काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे एक हंडा भरण्यास चक्क दहा मिनिटे लागतात. त्यातच नागरिकांकडून नळावर मोटारपंप लावण्यात आले आहेत.

ठळक मुद्देनळावर लावले जातात मोटारपंप : सुशिक्षितांचे बेकायदेशीर कृत्य

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरालगतच्या आलोडी, साटोडा, नालवाडी, पिपरी (मेघे) यासह अन्य भागात नळावर सर्रास मोटारपंप लावले जात असल्याने अनेकांना थेंबभर पाणी मिळेनासे झाले आहे. पर्यायाने कृत्रिम पाणीटंचाई या भागात निर्माण झाली आहे. जीवन प्राधिकरणाने नागरिकांच्या बेकायदेशीर कृत्याला आळा घालावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.शहरालगतच्या अकरा गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा होतो. मात्र, पाणीपुरवठ्याकरिता पीव्हीसी जलवाहिनी टाकण्यात आल्याने अनेकवेळा जलवाहिनीला गळती लागते. परिणामी, पाणीपुरवठा ठप्प होतो. दर्जाहीन जलवाहिनीमुळे काही भागात अतिदाबाने तर काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे एक हंडा भरण्यास चक्क दहा मिनिटे लागतात. त्यातच नागरिकांकडून नळावर मोटारपंप लावण्यात आले आहेत. त्यामुळे अनेकांना हंडाभरदेखील पाणी मिळत नाही. मागील चार दिवसांपासून आलोडी परिसरातील पाणीपुरवठा ठप्प होता. रविवारी सकाळी नळ आल्यानंतर अनेकांनी लगेच मोटारपंप लावून वारेमाप पाणीउपसा सुरू केला. यात अयोध्यानगर परिसरातील अनेकांना पिण्याच्या पाण्याविनाच राहावे लागले. त्यामुळे नागरिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि संवेदनाहिन नागरिकांप्रति प्रचंड संताप व्यक्त केला. महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाने धडक तपासणी मोहीम राबवून नळावर बेकायदेशीररीत्या मोटारपंप लावून पाणी उपसा करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईसह नळजोडणी खंडित करण्याची कारवाई करण्याची मागणी आलोडीतील नागरिकांनी केली आहे.जलवाहिनी नव्याने टाकण्याची मागणीनळयोजनेद्वारा पाणीपुरवठ्याकरिता कंत्राटदाराने जीआयऐवजी पीव्हीसी जलवाहिनी अंथरली आहे. आलोडी, साटोडा भागातून बांधकाम साहित्याची रात्रंदिवस वाहतूक सुरू असते. वाहनांच्या दाबामुळे जलवाहिनीला सातत्याने गळती लागले. मात्र, दुरुस्तीला बऱ्याचदा विलंब होत असल्याने पाणीपुरवठा ठप्् होतो. याकरिता पाणीपुरवठ्याकरिता नव्याने जलवाहिनी अंथरण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.नळ सोडण्याच्या वेळाच नाहीतआलोडी, साटोडा या भागात बºयाचदा सकाळी सहा वाजता, कधी आठ वाजता तर कधी १० आणि दुपारी १२ वाजता नळ सोडले जातात. त्यातही अल्प काळ पुरवठा सुरू असतो. नळाच्या ठरावीक वेळा नसल्यानेही अनेकांना पाण्यापासून वंचित राहावे लागते. नळ सोडण्याच्या वेळा निश्चित कराव्या, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई