शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

नवदाम्पत्यावर वधू कुटुंबीयांनी वर्धेतून टाकल्या अक्षता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 05:00 IST

आता मुलीचे लग्न आपण कसे बघणार असा हा प्रश्न कायम होता. त्यानंतर याची माहीती वर्धेचे माजी न.प. उपाध्यक्ष कमल कुलधरिया यांना मिळाली. त्यांनी तातडीने त्यांच्या निवासस्थानी वधू कुटुंबीयांना विवाह सोहळा बघता यावा, यासाठी विशेष व्यवस्था केली. याच ठिकाणाहून रविवारी दिल्लीत पार पडलेला विवाह सोहळा वधू कुटुंबीयांनी वर्धेतून बघत नवदाम्पत्यावर अक्षता टाकून त्यांना पुढील आयुषासाठी आर्शीवाद दिले.

ठळक मुद्देदिल्लीत पार पडला लग्नसोहळा : मुलीने विचारल्यानंतर कुटुंबीयांनीही दिली लग्नास परवानगी

चैतन्य जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मानवी जीवन पद्धतीत अनेक बदल होत आहेत. ऐरवी विवाह सोहळ्याला शेकडो निकटवर्तीय उपस्थित राहायचे. परंतु, ओढावलेल्या कोरोना संकटामुळे सध्या विवाह सोहळाही मोठ्या पद्धतीने करण्यावर प्रतिबंध घालण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर वर्धा शहराशेजारील रोठा येथील मूळ रहिवासी असलेल्या एका मुलीचा विवाह दिल्लीत रविवार २४ मे रोजी पार पडला; पण लॉकडाऊनमुळे दिल्ली न गाठू शकणाऱ्या वधूच्या आई-वडिलांनी वर्धेतूनच ऑनलाईन पद्धतीने लग्नसोहळा बघून नवदाम्पत्यावर अक्षता टाकून त्यांना आशीर्वाद दिले.वर्धा शहराशेजारील रोठा येथील गोविंद गोपाळ हे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहेत. त्यांना अर्धांगवायूच्या आजारने ग्रासले आहे. तर त्यांची पत्नी मंजूषा या शेती करून कुटुंबाचा गाढा ओढतात. शेतीच्या जोरावर या गोपाळ दाम्पत्याने त्यांचे अपत्य अश्विनी, नकुल, तेजस्वीनी आणि चांदणी या चौघांना उच्च शिक्षित केले. त्यानंतर अश्विनी हिला दिल्ली येथे एका खासगी कंपनीत नोकरी लागली. मुलगी लग्नाची झाल्याने तिच्या कुटुंबीयांना तिच्या लग्नाची चिंता सतावत होती. अशातच मुलीने तिचा जीवनसाथी शोधल्याचा निरोप तिने तिच्या आई-वडिलांना दिला. त्यावर कुटुंबीयांनीही होकार दर्शविला. फेब्रुवारी महिन्यात साखरपुड्याचा सोहळा पार पडला. शिवाय मार्च महिन्यात लग्नाची तारीख काढण्यात आली. लग्नाची २४ मार्च ही तारीख जवळ येत असतानाच देशात कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे वधू-वराचे हात पिवळे कसे करावे असा प्रश्न दोन्ही कुटुंबीयांना सतावू लागला. अश्विनीच्या कुटुंबाने आणि मनप्रितसिंहच्या कुटुंबांनी दोघांचीही समजूत काढली. त्यानंतर दिल्लीतच विवाह पार पाडण्याचे ठरले. आता मुलीचे लग्न आपण कसे बघणार असा हा प्रश्न कायम होता. त्यानंतर याची माहीती वर्धेचे माजी न.प. उपाध्यक्ष कमल कुलधरिया यांना मिळाली. त्यांनी तातडीने त्यांच्या निवासस्थानी वधू कुटुंबीयांना विवाह सोहळा बघता यावा, यासाठी विशेष व्यवस्था केली. याच ठिकाणाहून रविवारी दिल्लीत पार पडलेला विवाह सोहळा वधू कुटुंबीयांनी वर्धेतून बघत नवदाम्पत्यावर अक्षता टाकून त्यांना पुढील आयुषासाठी आर्शीवाद दिले.सर्वच आले होते सजूनवधूची आई मंजूषा, वडिल गोविंद, मुलगा नकुल तसेच बहिण तेजस्वीनी आणि चांदणी यांच्यासह आजोबा चिंतामणी शेंडे हे विवाह सोहळा बघण्यासाठी माजी न.प. उपाध्यक्ष कमल कुलधरीया यांच्याघरी सजून आले होते. वधू कुटुंबीय ऑनलाईन विवाह बघण्यासाठी आल्याची खात्री झाल्यावर पुढील लग्न विधी पार पडला.

टॅग्स :marriageलग्न