शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

भालेवाडीत अग्नितांडव; पाच गोठ्यांचा कोळसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 05:01 IST

गोठ्यातील शेतीपयोगी साहित्य, कुटार, बैलबंडी आणि स्पिंक्लरचे पाईप आगीत जळून राख झाले. या आगीमध्ये गोठ्यांपासून १०० मीटर अंतरावर असलेले निंबाचे झाडेही पूर्णत: जळाले. लगतच्या गुलाब बैगने व युवराज बैगने यांच्याही गोठ्याला झळ पोहोचली. आग लागल्याने गावात एकच गोंधळ उडाला.

ठळक मुद्देवासरु दगावले : शेतीपयोगी साहित्याचे नुकसान, दोन गोठ्यांना पोहोचली झळ, गावातील मोठा अनर्थ टळला

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : नजीकच्या भालेवाडी येथे गावालगत असलेल्या गोठ्यांना सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. गोठ्या जनावरांचे वैरण व लाकडी साहित्य असल्याने अल्पावधीतच रौद्र रुप धारण करुन पाच गोठ्यांच्या कोळसा केला. यात दीड वर्षाच्या एका वासराचाही होरपळून मृत्यू झाला.तेजराव भाऊराव चौधरी यांच्या गोठ्यातील कुटार व शेतीपयोगी साहित्यासह बांधून असलेले वासरु हे जळाले. तसेच हेमराज चौधरी, वसंत चौधरी, चिरकुट चौधरी व भीमराव चौधरी यांच्या गोठ्यातील शेतीपयोगी साहित्य, कुटार, बैलबंडी आणि स्पिंक्लरचे पाईप आगीत जळून राख झाले. या आगीमध्ये गोठ्यांपासून १०० मीटर अंतरावर असलेले निंबाचे झाडेही पूर्णत: जळाले. लगतच्या गुलाब बैगने व युवराज बैगने यांच्याही गोठ्याला झळ पोहोचली. आग लागल्याने गावात एकच गोंधळ उडाला. सुदैवाने गावाला पाणीपुरवठा करणारी पाण्याची टाकी भरलेली असल्याने गावातील नळ सोडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. पण, आग आटोक्यात येत नसल्याचे पाहून कारंजा येथील ओरएंटल टोल नाक्याचा टँकर बोलाविण्यात आला. तसेच आर्वी नगरपालिकेच्या अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. आग आटोक्यात आल्यानंतर तब्बल तीनतास उशिराने आर्वीचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. भालेवाडी या गावात जवळपास ६० टक्के शेतकऱ्यांनी अजुनही कापूस विकलेला नाही. अनेकांच्या घरात कापूस भरुन आहे. गावालगतच असलेल्या गोठ्यांना आग लागल्यानंतर गावकऱ्यांची दाणादाण झाली पण, सुदैवाने मोठी हानी टळली. या आगीमध्ये शेतकºयांचे मोठे नुकसान झाले असून दुपारपर्यंत कोणत्याही अधिकाºयांनी भेट दिली नाही.सिंदी (रेल्वे) - रविवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास येथील भोईपुरा परिसरातील नलू अरुण बावणे यांच्या घराला आग लागल्याने घरातील साहित्याची राखरांगोळी झाली. नलू बावणे यांचे भासरे भारत बावणे यांनी घरातील चूल पेटविली आणि साहित्याच्या खरेदीकरिता बाहेर निघून गेले. यादरम्यान घरामध्ये कुणीही नसताना चुलीतील विस्तवामुळे घराला आग लागली. यात घरातील साहित्यासह गहू, तांदूळ, तेल, कपडे, रेशनकार्ड यासह महत्त्वाचे कागदपत्र जळाले. यामध्ये त्यांचे वीस हजार रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार नलू बावणे यांनी केली आहे. पुढील तपास येथील पोलीस करीत आहे.बरबडीत गोठा जळल्याने एक लाखाचे नुकसानसमुद्रपूर : तालुक्यातील बरबडी येथील शेतकरी नानाजी चंदनखेडे यांचा कांढळी पुनर्वसन परिसरातील शेतात गोठा आहे. सोमवारी दुपारी या गोठ्यालगत असलेल्या रोहित्रामध्ये शॉर्टसर्किट होऊन ठिंणगी उडाल्याने परिसरातील गवताने पेट घेतला. वाºयामुळे ती आग पसरत गोठ्यापर्यंत येवून गोठ्यालाही कवेत घेतले. यामध्ये गोठ्यातील सर्व साहित्य जळाल्याने शेतकºयाचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. आगीची माहिती सिंदी (रेल्वे) येथील अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दल येईपर्यंत लहू वैद्य, गोपाळ उरकुडे, अमर बोरकर, प्रमोद वांदिले, प्रतिक वांदिले, अंकुश वैद्य, सुनील कापसे, दिनेश गावंडे, प्रीतम गजुरडे, सुनील ठवरे, पोलीस उपनिरीक्षक गावंडे, लाईनमन समीर पिंपळशेंडे, गोपाळ वंगळ, पोलीस कर्मचारी चावरे आदींनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले पण, आग आटोक्यात आली नाही. अखेर अग्निशमन दलाने पाण्याचा मारा करुन आगीवर नियंत्रण मिळविले. हंगामाच्या तोंडावरच शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याने नुकसान भरपाई देण्याची मागणी विद्युत विभागाकडे केली आहे.

टॅग्स :fireआग