शहरं
Join us  
Trending Stories
1
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
2
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
3
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
4
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... 
5
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
7
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
8
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
9
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
10
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
11
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
12
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
13
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
14
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
15
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
18
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
19
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
20
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार

७० शेतकऱ्यांना योजनेच्या लाभाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 5:00 AM

आर्वी उपविभागांतर्गत धडक सिंचन विहीर योजनेत ७०० विहीरी मंजूर आहेत. त्यापैकी २५० विहीरींच्या कामास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांना कार्यारंभ आदेश प्राप्त झाल्यावर संबंधित अभियंत्याने दिलेल्या ले-आऊट नुसार शेतकऱ्यांनी कामाला सुरूवात केली आहे. या योजनेसाठी आर्वी उपविभागासाठी १ कोटी २५ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. परंतु, पंचायत समितीकडून अजूनही ७० लाभार्थ्यांना देयक देण्यात आलेले नाही.

शेतकऱ्यांच्या अडचणीत भर : अधिकाऱ्यांचे दुर्लक्षलोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : हवालदील शेतकºयांना दिलासा मिळावा म्हणून शासनाने धडक सिंचन योजना कार्यान्वित केली. परंतु, तब्बल ७० शेतकºयांना प्रत्यक्षक काम सुरू करून अद्याप योजनेची रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. इतकेच नव्हे तर आर्वी पंचायत समिती प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.आर्वी उपविभागांतर्गत धडक सिंचन विहीर योजनेत ७०० विहीरी मंजूर आहेत. त्यापैकी २५० विहीरींच्या कामास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांना कार्यारंभ आदेश प्राप्त झाल्यावर संबंधित अभियंत्याने दिलेल्या ले-आऊट नुसार शेतकऱ्यांनी कामाला सुरूवात केली आहे. या योजनेसाठी आर्वी उपविभागासाठी १ कोटी २५ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. परंतु, पंचायत समितीकडून अजूनही ७० लाभार्थ्यांना देयक देण्यात आलेले नाही. पंचायत समितीला हा निधीच प्राप्त न झाल्याचे सांगण्यात येत आहे. देयक थकल्याने काही शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी राखून ठेवलेले पैसे तसेच काहींनी उसनवारी पैसे काढून आतापर्यंतचे बांधकाम केले आहे. कोरडवाहू शेतजमीन सिंचनाखाली येईल या आशेने होते नव्हते ते पैसे शेतकऱ्यांनी विहीर खोदण्यासाठी खर्च केले. पण हे नवीन संकट उभे झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. येत्या काही दिवसांनी पावसाचे आगमण होईल. त्यानंतर हे बांधकाम ठप्प पडण्याची शक्यता आहे. शिवाय झालेले खोदकामही खसण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे. या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने योग्य निर्णय घेत शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाFarmerशेतकरी